शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 17:26 IST

मनपा प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

जळगाव - शहरातील खड्ड्यांमुळे होणारा जनसामान्यांना त्रास व त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना झोपलेल्या मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा विरोधात बुधवारी कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून मनपासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात खड्डेुमुक्त शहरासाठी दिलेल्या आश्वासनाबाबत देखील आठवण करून देत ‘मामा, क्या हुआ तेरा वादा, झुठी कसम, झुठा वादा’ अशा घोषणा देत मनपा परिसर दणाणून सोडला.कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनापासून मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंगला पाटील, योगेश देसले, स्वामी रेणापुरकर यांच्यासह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टॉवर चौक, इच्छापुर्ती गणेश मंदिर, गोलाणी मार्केटमार्गे ही अंत्ययात्रा काढून मनपाच्या प्रवेशव्दारासमोर समारोप करण्यात आला.मनपा प्रशासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करामनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. तसेच अनेकांचा खड्डयांमुळे जीव गेला असून, या मृत्यूंना मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर ३०२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉँग्रेसकडून करण्यात आली. मनपा प्रशासन मुर्दाबाद, सत्ताधारी मुर्दाबादच्या जोरदार घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडण्यात आल्या.चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांचीआमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ‘ चिड येते ना खड्डयांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची’ या मथळ्याखाली शहरभर बॅनर लावले होते. याच बॅनरचा आधार घेत कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आमदारांचीच घोषणा त्यांच्यावर उलटवत मनपासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सत्ताधाºयांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘किती जणांचे बळी घेणार’ अशा घोषणांचे फलकदेखील यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा हातात होते. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात न केल्यास मनपावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिला.आयुक्तांना दिले निवेदनयावेळी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह रहिवाशी भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, जेथे डांबरीकरण शक्य नाही तेथे रस्त्यांचे सपाटीकरण करून खडी कच टाकून खड्डे तातडीने दुरुस्त व्हावेत, शहरातील साफसफाई असमाधानकारक असून, सहा महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या घंटागाड्या कार्यरत कराव्यात ,जेणेकरून स्वच्छता नीट होईल व शहरात अनेक भागात पथदिवे नादुरुस्त आहेत .ते तातडीने सुरु करावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव