शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 17:26 IST

मनपा प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

जळगाव - शहरातील खड्ड्यांमुळे होणारा जनसामान्यांना त्रास व त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना झोपलेल्या मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा विरोधात बुधवारी कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून मनपासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात खड्डेुमुक्त शहरासाठी दिलेल्या आश्वासनाबाबत देखील आठवण करून देत ‘मामा, क्या हुआ तेरा वादा, झुठी कसम, झुठा वादा’ अशा घोषणा देत मनपा परिसर दणाणून सोडला.कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनापासून मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंगला पाटील, योगेश देसले, स्वामी रेणापुरकर यांच्यासह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टॉवर चौक, इच्छापुर्ती गणेश मंदिर, गोलाणी मार्केटमार्गे ही अंत्ययात्रा काढून मनपाच्या प्रवेशव्दारासमोर समारोप करण्यात आला.मनपा प्रशासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करामनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. तसेच अनेकांचा खड्डयांमुळे जीव गेला असून, या मृत्यूंना मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर ३०२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉँग्रेसकडून करण्यात आली. मनपा प्रशासन मुर्दाबाद, सत्ताधारी मुर्दाबादच्या जोरदार घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडण्यात आल्या.चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांचीआमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ‘ चिड येते ना खड्डयांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची’ या मथळ्याखाली शहरभर बॅनर लावले होते. याच बॅनरचा आधार घेत कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आमदारांचीच घोषणा त्यांच्यावर उलटवत मनपासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सत्ताधाºयांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘किती जणांचे बळी घेणार’ अशा घोषणांचे फलकदेखील यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा हातात होते. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात न केल्यास मनपावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिला.आयुक्तांना दिले निवेदनयावेळी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह रहिवाशी भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, जेथे डांबरीकरण शक्य नाही तेथे रस्त्यांचे सपाटीकरण करून खडी कच टाकून खड्डे तातडीने दुरुस्त व्हावेत, शहरातील साफसफाई असमाधानकारक असून, सहा महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या घंटागाड्या कार्यरत कराव्यात ,जेणेकरून स्वच्छता नीट होईल व शहरात अनेक भागात पथदिवे नादुरुस्त आहेत .ते तातडीने सुरु करावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव