शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वॉटरग्रेस कंपनीचा सावळागोंधळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. आता शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी स्वत: याबाबतचा व्हिडीओ तयार करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. वॉटरग्रेसला मनपाने नव्याने संधी दिल्यावर वॉटरग्रेसविरोधात नगरसेवकांचा आवाज कमी झाला आहे. तरी शहरातील साफसफाईची समस्या कायम असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वजन वाढविण्यासाठी होत असलेल्या जुगाडावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी व सोमवारी देखील वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून थेट कचऱ्याऐवजी माती उचलली जात होती. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला असून, मनपा सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना पाठवून याबाबत तक्रार देखील केली आहे. याआधी देखील राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील मनपाकडे या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. अनेक महिन्यांपासून शहरात संबधित कंपनीकडून असे प्रकार सुरु असून, याकडे कोणताही नगरसेवक व प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे.

वजनाच्या मापात ‘पाप’

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड, वृक्षांच्या फांद्या देखील टाकल्या जात आहे. मनपाने कचऱ्याचा एका टनासाठी ९७० रुपये दर निश्चित केला आहे. दररोज शहरातून सरासरी २७० टन कचरा उचलला जात आहे. अनेकदा ३०० टन पर्यंत कचरा उचलला जात आहे. कचऱ्याचा मापात ‘पाप’ करून मोठ्या रक्कमेचे बीलं मनपाकडून वसुल केले जात आहेत. सुरुवातीला नगरसेवकांकडून विरोध होत असल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचा विरोध कमी झाल्याने मक्तेदाराला मोकळे रानच मिळाले आहे.

मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष

या प्रकाराकडे मनपा प्रशासन देखील फारसे गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे वॉटरग्रेसला सर्व पैसा मनपाच्या तिजोरीतूनच जात असताना, प्रशासन याबाबत वॉटरग्रेसवर कारवाई करण्यास मागे का हटत आहे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

कोट..

शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी वजन वाढविण्यासाठी करारनाम्यातील अटी-शर्थींचा भंग केल्याचे आढळून येते. याबाबत या कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

-पवन पाटील, सहाय्यक आयुक्त