शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

कर्जमाफीचा सावळागोंधळ कायम-यादी नसल्याने पैसेही झाले नाहीत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 22:53 IST

पात्र शेतकºयांच्या हिरव्या यादी आलीच नाही

ठळक मुद्दे जिल्हा बँकेलाही काहीही आदेश नाहीतप्रमाणपत्र दिलेल्या ३२ शेतकºयांबाबतही नाही माहितीआकडेवारीबाबतही घोळ

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२६- शेतकरी कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरूच असून मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केल्यानुसाार गुरूवारी पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होऊन कर्जमुक्तीची सुरूवात होणार होती. मात्र पात्र शेतकºयांची हिरवी यादीच गुरूवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नसल्याने व जिल्हा बँकेलाही त्याबाबत काहीही आदेश आलेले नसल्याने एकाही शेतकºयाच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकले नाहीत. तसेच बुधवार दि.१८ रोजी जिल्हास्तरावर कर्जमुक्तीच्या प्रारंभाचा कार्यक्रम घेऊन ३२ श्ोतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मात्र त्यांच्या खात्यावरील कर्ज फिटल्याची नोंद झाली आहे का? याची माहिती जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बँकेच्या अधिकाºयांनाही नाही. मात्र एका अधिकाºयाने वि.का. सोसायटी स्तरावर कर्जखाते निल (कर्जमुक्त) केले असल्याचा दावा नाव न सांगण्याच्या अटीवर केला.आकडेवारीबाबतही घोळसहकार विभागाकडून केवळ ८ याद्यांना मंजुरी मिळाल्याचे तर ७१० याद्यांना अंशत: मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकºयांची संख्या मात्र सहकार विभागाकडेही नसल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या वेबसाईटवरच ही पात्र शेतकºयांची तसेच अपात्र, प्रलंबित आदी विविध ४ रंगातील याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे आकडेवारीचा घोळ अजूनही कायम आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत ही यादी प्रसिद्ध झालेली नव्हती.याद्या दुरुस्तीसाठी जाणार वेळज्या याद्यांमधील अर्जात अथवा माहितीत त्रुटी आहेत. त्याची पूर्तता अथवा दुरुस्तीसाठी पुन्हा वेळा जाणार आहे. त्यामुळे अंशत: पात्र तसेच प्रक्रिया सुरू असलेल्या, प्रतीक्षेत असलेल्या यादीतील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.यापूर्वी झालीय ३७९ कोटींची कर्जमाफीयुपीए सरकारच्या काळात २००८ मध्ये केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील ८९ हजार ८०४ शेतकºयांना १६७ कोटी २० लाखांच्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा बँकेमार्फत मिळाला होता. तर २००९ मध्ये राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीत १ लाख ६३ हजार ९२७ शेतकºयांना २११ कोटी ७१ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्याबाबतची माहिती स्कॅन करून सीडीच्या स्वरूपात शासनाला पाठविण्यात आली होती, असा दावा जिल्ह बँकेच्या सूत्रांनी केला.