शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

संकटावर मात करी स्वाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:12 IST

जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.देवानंदा सांखला लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

स्वाध्याय गुरू की वाणी है, स्वाध्याय आत्मकहानी है. स्वाध्यायसे प्रमाद दूर करो, स्वाध्याय करोस्वाध्याय प्रभू के चरणोंमे पहुचने का साधन मानो, स्वाध्याय है मित्र, स्वाध्याय है गुरू स्वाध्याय करो,टी.व्ही., मोबाइल, संगणक मे जीवन धन बर्बाद मत करो, सत्संग करो, सद्ग्रंथ पढो, स्वाध्याय करो.स्वाध्याय आत्म्याचा अत्यंत निकटचा हितैषी मित्र आहे. भारतातील प्रत्येक दर्शनमध्ये स्वाध्याय या क्रियेला महत्वाचे, मानाचे स्थान दिले आहे. या विश्वात अनेक आत्मा भटकत आहे. त्यांच्यावर धर्मगुरूंनी, प्रभुंनी अनंताअनंत करुणा, कृपा केली आणि स्वाध्याय करण्याचा सल्ला दिला.जन्म-मृत्यूच्या भटकणाऱ्या फेºयातून मुक्त होण्यासाठी, सद्गती मिळवण्यासाठी, धर्मग्रंथाचे वाचन-चिंतन-मनन-स्मरण, आचरण करण्याचा, अर्थात दुसºया शब्दात स्वाध्याय करण्याचा मौलिक संदेश दिला. स्वाध्याय हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. त्याचा कर्तव्य आहे. शरीराची भूक आहाराने तृप्त होते. तद्वतच मनाची तृप्ती स्वाध्याय साधनेने होते. भारतातील सर्व दर्शन तप-त्याग प्रधान आहे. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र आणि सम्यक तप या सर्वांच्या सम्यक आचरणाने साधक आपल्या सिद्धीपर्यंत पोहोचू शकतो. स्वाध्याय साधनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. स्वाध्याय ही एक महान सद्प्रवृत्ती आहे. जी बर्हिआत्म्याला मिध्यात्वपासून समकित, समकितपासून देशविरती, देशविरतीपासून सर्व विरती आणि सर्वविरतीपासून वितरागत्वाकडे नेते. जे साधक शिथिलाचारी आहेत, त्यांना दृढधर्मी, प्रियधर्मी बनवून शेवटी सर्व कर्मातून मुक्त करून परमात्मा बनण्याची प्रेरणा व बळ देते. स्वाध्याय केल्याने सन्मान मिळतो, सौभाग्य प्राप्ती होते. बुद्धीमध्ये वृद्धी होते. साधुता येते. या सर्वामुळे अलौकिक शांती मिळते. स्वाध्याय सर्व दु:खावरील रामबाण उपाय आहे. मानवी मन हे प्रचंड चंचल आहे. अशा ह्या अस्थिर मनाला स्थैर्य देण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वाध्याय उपयोगी शस्त्र आहे. स्वाध्यायी साधक सर्वत्र पूजला जातो.स्वाध्याय अर्थात ‘स्व’चा स्वत:च्या आत्म्याचे ज्ञान होणे, ‘स्व’ आणि स्वत:चे अध्ययन करणे, ‘स्वस्थ आत्म्न: अध्ययन् स्वाध्याय:’ अर्थात स्वत:च्या आत्म्याचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय आणि अशा हा अभ्यास करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. गुरूभगवंत, श्रेष्ठ -ज्ञानी, महापुरूष यांच्या सानिध्यात जाणे, नवनवीन ज्ञानप्राप्ती करणे, आत्मसात करणे, त्याची उजळणी करणे, त्यावर चिंतन करणे, त्याचा प्रसार करणे इत्यादी क्रियांचा त्यात समावेश होतो. इतिहासात म्हटले आहे, ‘स्वाध्याये शान्ति दक्तमा’ अर्थात स्वाध्याय केल्याने संचित कर्म सहज क्षय होतात.अनादिकालापासून अज्ञान व मोह यामध्ये अडकलेल्या, बेभान झालेल्या, आत्म्याला जागृत करून त्याला त्याच्या मूळ जागेवर पुन: प्रस्थापित करण्यासाठी स्वाध्याय अनन्यसाधारण अस्त्र आहे. अज्ञानरूपी अंधारात विषय कषाय रुपी तुफानमध्ये फसलेल्या व्यक्तीसाठी स्वाध्याय ही टॉर्च आहे. ही टॉर्च सोबत असेल तर तो सहजरित्या संसारातील संकटावर मात करून उद्देशापर्यंत पोहोचू शकेल. ज्याने टॉर्चला ओझे मानून फेकून दिले त्याच्या नशिबात अज्ञान, भ्रमण हाच पर्याय शिल्लक आहे.स्वाध्यायशिवाय केलेले जप, तप, पूजा, पाठ सर्व निरर्थक आहे. स्वाध्यायची विशेषत: व महत्ता जाणून प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी गुरूकुलातील अध्ययन संपवून निरोप घेत तेव्हा गुरू त्यांना आशीर्वाद देताना सांगत, ‘स्वाध्यायन्मा प्रमद’ अर्थात स्व-अध्याय कर. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ज्योती व दीप्ती प्राप्त करणाºया स्वाध्यायाचे महत्व जाणून स्वाध्याय क्रिया जीवनात उतरावी, हीच हार्दिक कामना-अभिलाषा आहे.-प्राचार्या डॉ.देवानंदा सांखला, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव