शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गोपाळ काल्याच्या कीर्तनाने मुक्ताई पालखी सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:17 IST

विनायक वाडेकर मुक्ताईनगर , जि.जळगाव : आषाढी एकादशीची वारी संपल्यानंतर पौर्णिमेला पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यात होणारा गोपाळकाला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात ...

ठळक मुद्देमुक्ताई पादुकांजवळ केली गोपाळपुराची निर्मितीह.भ.प. हरणे महाराजांनी केले काल्याचे कीर्तन

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : आषाढी एकादशीची वारी संपल्यानंतर पौर्णिमेला पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यात होणारा गोपाळकाला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात न करता मुक्ताईनगर येथे केवळ १५ तासात स्वगृही पोहोचलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याची सांगता रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी झाली. तसेच मुक्ताईनगर येथेही इतर संतांच्या संस्थानप्रमाणेच गोपाळपुरा असावा म्हणून बोदवड रस्त्यावरील आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका मंदिराजवळच गोपाळपुरा बनवण्याची घोषणा केली.दरवर्षी संत मुक्ताईची पालखी ही मुक्ताईनगर येथून पंढरपूर व पौर्णिमेनंतर गोपाळकाला झाल्यावर स्वगृही परत फिरते. ३११ वर्षांपासूनच्या या परंपरेसाठी ३४ जिल्हे, १४०० किलोमीटर व ७० दिवसांचा प्रवास हा पायी केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब अंतराची वारी म्हणून आदिशक्ती मुक्ताईची वारी गणली जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ २० भाविकांसाठी परवानगी मुक्ताई वारीला मिळालेली होती.रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर काल्याचे कीर्तन हभप रवींद्र हरणे महाराज यांनी केले.पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा या ज्ञानोबारायाच्या कीर्तनाने काल्याचे कीर्तन करतो, तशी वारीची सांगता करण्यात आली. ज्याप्रमाणे पाण्याला कोणताही रंग नसतो मात्र अथांग पाणी दिसते; तेव्हा ते पाणी निळे भासते असेच विठोबाचे रूप विहंगम आहे. ज्ञानोबाराया, विठोबा हे काळ्या अथवा सावळ्या रुपात न दिसता निळ्या रूपात दिसतात. कोरोना विषाणू जीवन जगण्याची दिशाच बदलली असून निगेटिव्हला सन्मान मिळवून देण्याचा जगातला कदाचित पहिलाच प्रकार असावा, असे प्रतिपादन हरणे महाराज यांनी करत आदिशक्ती मुक्ताई म्हणजे गुरू सद्गुरू व जगद्गुरू यांचे रूप असल्याचे वर्णन त्यांनी केले.काल्याचे कीर्तन म्हणजे वारकऱ्यांसाठी सर्वश्रेष्ठ कीर्तन आहे. देवालाही दुर्लभ असलेला काला हा संतांच्या संगतीमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो, असे हे दुर्लभ असे भाग्य मानवाला मिळाले म्हणून ‘तुका म्हणे काला दुर्लभ कोणाला’ असा उच्चार करतात. देवांनाही दुर्लभ हा काला सर्वसामान्यांना केवळ संतांच्या संगतीमुळे लाभतो म्हणून तुझे संगती झाली माझी शुद्धी तृप्ती असे गोपाळ काल्याचे वर्णन हरणे महाराज यांनी याप्रसंगी केले.मुक्ताईनगर येथे गोपाळपुºयाची निर्मितीदेवाचे दर्शन म्हणजेच संत व देवाचे मनोमिलन झाल्यानंतर पौर्णिमेला गोपाळकाला हा केला जातो. काल्याचे कीर्तन हे पंढरपूरच्या गोपाळपुºयात केले जाते, मात्र यावर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रशासनाला वेठीस धरून पंढरपूरला थांबण्याऐवजी आपापल्या संस्थानमध्ये जाऊन काला करावा, असे महाराष्ट्रातील मानाच्या नऊ संस्थानच्या पालखीप्रमुखांनी ठरवले होते. त्यामुळे द्वादशीलाच आदिशक्ती मुक्ताईची पालखी १५ तासांचा प्रवास करत नवीन मुक्ताई मंदिरात येऊन विसावली. मात्र काल्याचे कीर्तन झाल्याशिवाय वारीला महत्त्व प्राप्त होत नाही म्हणून मुक्ताईनगर येथे काल्याचे कीर्तन करण्यात आले. महाराष्ट्रातील मानाच्या सर्व संस्थानच्या स्थळी गोपाळपूरची निर्मितीही करण्यात आली. मात्र मुक्ताईनगर येथे गोपाळपुरा नसल्याने आजपर्यंत मुक्ताईनगरात काल्याचे कीर्तन गोपाळपुºयात होऊ शकले नव्हते म्हणून आदिशक्ती मुक्ताईचे नवीन देवस्थान असलेल्या बोदवड रस्त्यावरील आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका असलेल्या मंदिर स्थळी गोपाळपूरची निर्मिती करण्याची मागणी काल्याच्या कीर्तनप्रसंगी पुढे आली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटीलही उपस्थित होते. गोपाळपुरा हा पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी निर्माण करण्यात यावा, अशी नगर पंचायतकडेही संस्थानतर्फे मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशीही अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी चर्चा केली.सकाळी आरती व अभिषेक झाल्यानंतर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे मंदिराला पालखी परिक्रमा घालण्यात आली. आजच्या या सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, नितीन महाराज, विशाल महाराज खोले, हभप खवले महाराज, निवृत्ती पाटील, विशाल सापधरे, उद्धव जुनारे महाराज, ज्ञानेश्वर हरणे तसेच मुक्ताईच्या स्वरूपात रवींद्र हरणे महाराजांच्या दोन्ही जुळ्या कन्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर