शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कोथळी येथे संत मुक्ताबाई पादुका स्वस्थळी गाभाऱ्यात विराजमान करून आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:26 IST

यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.

ठळक मुद्देपरंपरेच्या उपासकामुळेच पालखी सोहळा टिकून हभप रवींद्र हरणे महाराजपूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।। घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनंत अडचणी येऊनही केवळ परंपरेच्या उपासकामुळेच ही परंपरा अखंडित राहिल्याचे याप्रसंगी रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.तब्बल ५६ दिवसांनी आज परंपरागत तिथीनुसार नवीन मंदिर येथून पालखी मुख्य समाधी मंदिर कोथळी येथे आणण्यात आले. त्यावेळी गुलाबपुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले.नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पालखी पूजन केले. पादुकांना पंचामृताने अभिषेक व आरती विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक केली. मुक्ताबाई-मुक्ताबाई जयघोषात संत मुक्ताबाई पादुकांना गाभाºयात विराजमान करण्यात आले.पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।या अभंगाप्रमाणे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले व आषाढी वारीची सांगता झाली. मंदिर परिसर रांगोळी तोरणे पताका लावून सजविला होता.यावेळी संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकात पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसू खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, अन्नदाते नीना काठोके तसेच मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.हरणे महाराजांचे कीर्तनआपल्या कीर्तनात ह.भ.प. रवींंद्र हरणे महाराज यांनी परंपरेचे उपासकांनामुळेच पालखी सोहळा टिकून आहे. सोहळा किंवा मंदिर उभारणे कठीण नाही. परंतु ती परंपरा पुढे चालू ठेवणे हे कठीण असते. संत मार्गाने अंधानुकरण केले आणि संतांच्या विचारानुसार कृती केली तरी जीवन सफल होते. जीव हा अपूर्ण आहे म्हणून पूर्णत्व असलेल्या भगवंत रुपाकडे आपण ध्यान लावले पाहिजे आणि प्रसाराचे पृथक्करण करून सार असलेल्या भगवंतामध्ये आपण लिन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर