शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोथळी येथे संत मुक्ताबाई पादुका स्वस्थळी गाभाऱ्यात विराजमान करून आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:26 IST

यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.

ठळक मुद्देपरंपरेच्या उपासकामुळेच पालखी सोहळा टिकून हभप रवींद्र हरणे महाराजपूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।। घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनंत अडचणी येऊनही केवळ परंपरेच्या उपासकामुळेच ही परंपरा अखंडित राहिल्याचे याप्रसंगी रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.तब्बल ५६ दिवसांनी आज परंपरागत तिथीनुसार नवीन मंदिर येथून पालखी मुख्य समाधी मंदिर कोथळी येथे आणण्यात आले. त्यावेळी गुलाबपुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले.नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पालखी पूजन केले. पादुकांना पंचामृताने अभिषेक व आरती विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक केली. मुक्ताबाई-मुक्ताबाई जयघोषात संत मुक्ताबाई पादुकांना गाभाºयात विराजमान करण्यात आले.पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।या अभंगाप्रमाणे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले व आषाढी वारीची सांगता झाली. मंदिर परिसर रांगोळी तोरणे पताका लावून सजविला होता.यावेळी संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकात पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसू खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, अन्नदाते नीना काठोके तसेच मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.हरणे महाराजांचे कीर्तनआपल्या कीर्तनात ह.भ.प. रवींंद्र हरणे महाराज यांनी परंपरेचे उपासकांनामुळेच पालखी सोहळा टिकून आहे. सोहळा किंवा मंदिर उभारणे कठीण नाही. परंतु ती परंपरा पुढे चालू ठेवणे हे कठीण असते. संत मार्गाने अंधानुकरण केले आणि संतांच्या विचारानुसार कृती केली तरी जीवन सफल होते. जीव हा अपूर्ण आहे म्हणून पूर्णत्व असलेल्या भगवंत रुपाकडे आपण ध्यान लावले पाहिजे आणि प्रसाराचे पृथक्करण करून सार असलेल्या भगवंतामध्ये आपण लिन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर