शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कोथळी येथे संत मुक्ताबाई पादुका स्वस्थळी गाभाऱ्यात विराजमान करून आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:26 IST

यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.

ठळक मुद्देपरंपरेच्या उपासकामुळेच पालखी सोहळा टिकून हभप रवींद्र हरणे महाराजपूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।। घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनंत अडचणी येऊनही केवळ परंपरेच्या उपासकामुळेच ही परंपरा अखंडित राहिल्याचे याप्रसंगी रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.तब्बल ५६ दिवसांनी आज परंपरागत तिथीनुसार नवीन मंदिर येथून पालखी मुख्य समाधी मंदिर कोथळी येथे आणण्यात आले. त्यावेळी गुलाबपुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले.नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पालखी पूजन केले. पादुकांना पंचामृताने अभिषेक व आरती विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक केली. मुक्ताबाई-मुक्ताबाई जयघोषात संत मुक्ताबाई पादुकांना गाभाºयात विराजमान करण्यात आले.पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।या अभंगाप्रमाणे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले व आषाढी वारीची सांगता झाली. मंदिर परिसर रांगोळी तोरणे पताका लावून सजविला होता.यावेळी संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकात पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसू खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, अन्नदाते नीना काठोके तसेच मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.हरणे महाराजांचे कीर्तनआपल्या कीर्तनात ह.भ.प. रवींंद्र हरणे महाराज यांनी परंपरेचे उपासकांनामुळेच पालखी सोहळा टिकून आहे. सोहळा किंवा मंदिर उभारणे कठीण नाही. परंतु ती परंपरा पुढे चालू ठेवणे हे कठीण असते. संत मार्गाने अंधानुकरण केले आणि संतांच्या विचारानुसार कृती केली तरी जीवन सफल होते. जीव हा अपूर्ण आहे म्हणून पूर्णत्व असलेल्या भगवंत रुपाकडे आपण ध्यान लावले पाहिजे आणि प्रसाराचे पृथक्करण करून सार असलेल्या भगवंतामध्ये आपण लिन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर