शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:54 IST

५० टक्के मजूर परप्रांतीय

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने विविध घोषणा केल्याने उद्योग क्षेत्रातून त्याचे स्वागत होत आहे. असे असले तरी उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता राहणार आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाउननंतर मजूर पुन्हा परतण्याची चिंता आहे. यात जळगावातील चटई उद्योग मोठा असल्याने सीमा बंदी राहिल्यास कच्च्या मालाचा तुटवडा भासणार असल्याचीही चिंता उद्योजकांना आहे. सध्या जे उद्योग सुरू झाले तेथे मजुरांच्या कमी संख्येमुळे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले. यात राज्यात हा निर्णय होण्यापूर्वीच जळगाव जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली व कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यानंतर शिथिलता देण्यात आल्याने काही उद्योग सुरू झाले. मात्र तेथे मजुरांचा प्रश्न कायम आहे.देशभरातील प्लॅस्टिक कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो व येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केले जातात. त्यामुळे जळगावची ‘चटई हब’ म्हणूनदेखील ओळख झाली असून आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते. मात्र हा उद्योग सर्वस्वी मजुरांवर अवलंबून असून मजूरच गावी परतल्याने व ते पुन्हा कामावर येण्याची चिंता असल्याने चटईची परदेश वारी थांबते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.मजूर गावी परतलेजळगावात छोटे-मोठे जवळपास १४०० उद्योग असून यात बहुतांश उद्योग हे प्लॅस्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. त्यामुळे हा उद्योग मोठ्या मोठ्या मशनरींपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून (लेबर बेस) आहे. त्यामुळे येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून यात ५० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे लॉकडाउन दरम्यान बहुतांश मजूर गावी परतले आहेत. आता लॉकडाउननंतरही ते परतणार की नाही, याची चिंता उद्योजकांना आहे. कारण लॉकडाउन संपले तरी त्यानंतर शेतीची कामे सुरू होतील व मजूर त्यात अडकले तर ते परण्याची शक्यता कमी असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.जळगावातील बहुतांश उद्योग हे मजुरांवर अवलंबून आहे. यात ५० टक्के मजूर परप्रांतीय असल्याने अनेक जण गावी परतले आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता भासण्याची भीती आहेच. केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या स्वागतार्ह आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्री असोसिएश (जिंदा), जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव