शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:54 IST

५० टक्के मजूर परप्रांतीय

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने विविध घोषणा केल्याने उद्योग क्षेत्रातून त्याचे स्वागत होत आहे. असे असले तरी उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता राहणार आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाउननंतर मजूर पुन्हा परतण्याची चिंता आहे. यात जळगावातील चटई उद्योग मोठा असल्याने सीमा बंदी राहिल्यास कच्च्या मालाचा तुटवडा भासणार असल्याचीही चिंता उद्योजकांना आहे. सध्या जे उद्योग सुरू झाले तेथे मजुरांच्या कमी संख्येमुळे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले. यात राज्यात हा निर्णय होण्यापूर्वीच जळगाव जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली व कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यानंतर शिथिलता देण्यात आल्याने काही उद्योग सुरू झाले. मात्र तेथे मजुरांचा प्रश्न कायम आहे.देशभरातील प्लॅस्टिक कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो व येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केले जातात. त्यामुळे जळगावची ‘चटई हब’ म्हणूनदेखील ओळख झाली असून आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते. मात्र हा उद्योग सर्वस्वी मजुरांवर अवलंबून असून मजूरच गावी परतल्याने व ते पुन्हा कामावर येण्याची चिंता असल्याने चटईची परदेश वारी थांबते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.मजूर गावी परतलेजळगावात छोटे-मोठे जवळपास १४०० उद्योग असून यात बहुतांश उद्योग हे प्लॅस्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. त्यामुळे हा उद्योग मोठ्या मोठ्या मशनरींपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून (लेबर बेस) आहे. त्यामुळे येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून यात ५० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे लॉकडाउन दरम्यान बहुतांश मजूर गावी परतले आहेत. आता लॉकडाउननंतरही ते परतणार की नाही, याची चिंता उद्योजकांना आहे. कारण लॉकडाउन संपले तरी त्यानंतर शेतीची कामे सुरू होतील व मजूर त्यात अडकले तर ते परण्याची शक्यता कमी असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.जळगावातील बहुतांश उद्योग हे मजुरांवर अवलंबून आहे. यात ५० टक्के मजूर परप्रांतीय असल्याने अनेक जण गावी परतले आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता भासण्याची भीती आहेच. केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या स्वागतार्ह आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्री असोसिएश (जिंदा), जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव