शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:54 IST

५० टक्के मजूर परप्रांतीय

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने विविध घोषणा केल्याने उद्योग क्षेत्रातून त्याचे स्वागत होत आहे. असे असले तरी उद्योगांसमोर आता मजुरांची चिंता राहणार आहे. ५० टक्के परप्रांतीय मजुरांवर अवलंबून असलेल्या जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाउननंतर मजूर पुन्हा परतण्याची चिंता आहे. यात जळगावातील चटई उद्योग मोठा असल्याने सीमा बंदी राहिल्यास कच्च्या मालाचा तुटवडा भासणार असल्याचीही चिंता उद्योजकांना आहे. सध्या जे उद्योग सुरू झाले तेथे मजुरांच्या कमी संख्येमुळे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले. यात राज्यात हा निर्णय होण्यापूर्वीच जळगाव जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील उद्योगांची धडधड थांबली व कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यानंतर शिथिलता देण्यात आल्याने काही उद्योग सुरू झाले. मात्र तेथे मजुरांचा प्रश्न कायम आहे.देशभरातील प्लॅस्टिक कचरा एकत्रित करून तो जळगावात येतो व येथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून पाईप, चटई तयार केले जातात. त्यामुळे जळगावची ‘चटई हब’ म्हणूनदेखील ओळख झाली असून आखाती देशांसह विविध देशांमध्ये येथील चटई निर्यात होते. मात्र हा उद्योग सर्वस्वी मजुरांवर अवलंबून असून मजूरच गावी परतल्याने व ते पुन्हा कामावर येण्याची चिंता असल्याने चटईची परदेश वारी थांबते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.मजूर गावी परतलेजळगावात छोटे-मोठे जवळपास १४०० उद्योग असून यात बहुतांश उद्योग हे प्लॅस्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. त्यामुळे हा उद्योग मोठ्या मोठ्या मशनरींपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून (लेबर बेस) आहे. त्यामुळे येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून यात ५० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे लॉकडाउन दरम्यान बहुतांश मजूर गावी परतले आहेत. आता लॉकडाउननंतरही ते परतणार की नाही, याची चिंता उद्योजकांना आहे. कारण लॉकडाउन संपले तरी त्यानंतर शेतीची कामे सुरू होतील व मजूर त्यात अडकले तर ते परण्याची शक्यता कमी असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.जळगावातील बहुतांश उद्योग हे मजुरांवर अवलंबून आहे. यात ५० टक्के मजूर परप्रांतीय असल्याने अनेक जण गावी परतले आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता भासण्याची भीती आहेच. केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या स्वागतार्ह आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्री असोसिएश (जिंदा), जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव