शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

By admin | Updated: February 6, 2017 00:26 IST

माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील : विज्ञान साहित्य संमेलनाचा समारोप

जळगाव : आजच्या व नव्या पिढीर्पयत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामधून केवळ त्याचा अभ्यास होवू शकतो. मात्र त्याला विज्ञान कळू शकत नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.विद्याथ्र्याना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे, अशीही अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली.  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद मुंबई व जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित तिस:या विज्ञान साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक अ.पां.देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.व्ही.सोमवंशी, जिल्हा कार्यवाहक दीपक तांबोळी, कोषाध्यक्ष शशिकांत नेहते आदी उपस्थित होते. दोन दिवसीय विज्ञान साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी लेखक व विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला. तरुणांर्पयत विज्ञान पोहचणे आवश्यक-कुलकर्णी4संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी  ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती.  तरुणांर्पयत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले. 4डॉ.के.बी.पाटील म्हणाले की, विज्ञानाचा झपाटय़ाने विकास होत आहे. तसेच या आधुनिक काळात स्पर्धा देखील वाढत आहे व या स्पर्धेत पालक वर्ग आपल्या पाल्यांना ढकलत आहे. यामुळे पाल्यांचा खरा विकास होवू शकत नाही. पालक वर्गाने प्राथमिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीची सक्ती करायला नको. तसेच विद्याथ्र्याना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे.  अ.पां.देशपांडे म्हणाले की, वैज्ञानिक संशोधनाचा वापर हा समाजासाठी होणे गरजेचे आहे.तरुणांर्पयत विज्ञान पोहचणे आवश्यक-कुलकर्णीसंमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी  ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती.  तरुणांर्पयत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.