धुळे - नंदुरबार डिस्ट्रिक सेंट्रल को - आॅप बँक वर्कर्स आॅर्गनायझेशनने त्यांच्याबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे संघटनेच्या तक्रारींवर नि:पक्षपातीपणे चौकशी होऊ शकेल, असे मत पदाधिकार्यांनी व्यक्त केले आहे. घोणसे-पाटील यांना २०११ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ ३० जून २०१४ ला संपत आहे. तीस मुद्यांच्या आधारे एक टिपण संघटनेने प्रशासक मंडळाचे अध्यक्ष रामेंद्रकुमार जोशी यांना १ मार्चला दिले. त्यात घोणसे-पाटील यांच्याविषयी झालेले आरोप व चौकशीच्या मागणीचे मुद्दे असे : बँकेच्या हिताविरोधात निर्णय घेणे, अवास्तव व नियमबाह्य प्रवास भत्ते मंजूर करून घेणे, एकाच दिवशी वेगवेगळ््या ठिकाणी बँकेच्या व भाड्याच्या वाहनाने प्रवास केल्याचे दाखवून हॉटेलचे व पाहा/२ ‘डीडीसीसी’चे सीईओंना सक्तीची रजा (पान १ वरून) अन्य खर्चाचे बिल घेणे. कार्यालयीन काम नसताना विनाकारण प्रवास व भत्ता घेणे. प्रा. वैद्यनाथन पॅकेजअंतर्गत ८ लाख ५६ हजाराचा निधी बँकेस मिळाला. त्या रक्कमेचा स्वत:साठी वापर केला. शिरपूर सहकारी साखर कारखाना जप्तीविषयी झालेल्या खर्चाचा तपशिल सादर न करणे व परस्पर मळी विक्रीतून खर्च वर्ग केला असून तो ४० लाख रूपये आहे. बँकेवर रिझर्व बँकेचे निर्बंध आल्यानंतर घोणसे- पाटील यांनी स्वत:ची ठेव रक्कम काढल्याने भयभित कर्मचार्यांसह इतरांनी सुमारे ६०० कोटींच्या ठेवी काढल्याने नुकसान झाले. प्रशासक मंडळाने १५ जानेवारीला पाटील यांच्यासह अन्य अधिकार्यांचे अधिकारावर बंधने आणली होती. यानंतरही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या सीईओंना सक्तीची रजा
By admin | Updated: May 16, 2014 01:00 IST