शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

भावभोळया भक्तीची ही एक तारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:17 IST

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ...

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ते फक्त काही मागण्यासाठी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच स्वरा अपराधी.... या भक्ती गीतात सांगितल्याप्रमाणे मनात भक्ती भाव न ठेवता फक्त देवाने इच्छा पूर्ण करावी हाच ध्यास मनुष्य घेत असतो. खरं तर भगवंत भाव, भक्तीचाच भुकेला आहे. जो कोणी त्याला शुद्ध अत:करणाने अर्पण करतो ते तो आनंदाने स्वीकारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितले आहे.शबरीने भक्ती पूर्वक अर्पण केलेली बोर रामाने मोठ्या आवडीने स्वीकार करून खाल्ले. इतकेच काय तर रिकामे झालेल्या अक्षय पात्रातून उरलेल्या भाजीचा एक कण खाऊन भगवंतांनी ऋतू कालोत्स पुष्पाणी समर्पयामी, असे म्हणून त्या-त्या ऋतूत आलेल कोणतेही फुल भगवंताला अर्पण केले तरी भगवंत ते फुुल आनंदाने स्वीकरतो.भगवंताला काहीच नाही तर रोज पाणी जरी अर्पण केले तरी तो ते आनंदाने स्वीकारतो, पण त्यात भक्ताची भाव भक्ती असायला हवी. सुदामाने आणलेली पोहयाची गाठोडी घेऊन त्या भक्तीच्या पोह्याची गाठ भगवंतांनी स्वत:च्या हाताने सोडली आणि मुठभर पोहे खाऊन तृप्त झाले, अशी अनेक उदाहरणे देता येतील जी भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. मनुष्याने स्वार्थ सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करून भगवंत भक्ती केल्यास मनुष्याचा स्वत:चा उत्कर्ष होईल. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता ही प्रेरणा दिली पाहिजे.-नाना महाराज कुलकर्णी,  पिंप्राळा

टॅग्स :Jalgaonजळगाव