शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भावभोळया भक्तीची ही एक तारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 23:17 IST

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ...

मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ते फक्त काही मागण्यासाठी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच स्वरा अपराधी.... या भक्ती गीतात सांगितल्याप्रमाणे मनात भक्ती भाव न ठेवता फक्त देवाने इच्छा पूर्ण करावी हाच ध्यास मनुष्य घेत असतो. खरं तर भगवंत भाव, भक्तीचाच भुकेला आहे. जो कोणी त्याला शुद्ध अत:करणाने अर्पण करतो ते तो आनंदाने स्वीकारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितले आहे.शबरीने भक्ती पूर्वक अर्पण केलेली बोर रामाने मोठ्या आवडीने स्वीकार करून खाल्ले. इतकेच काय तर रिकामे झालेल्या अक्षय पात्रातून उरलेल्या भाजीचा एक कण खाऊन भगवंतांनी ऋतू कालोत्स पुष्पाणी समर्पयामी, असे म्हणून त्या-त्या ऋतूत आलेल कोणतेही फुल भगवंताला अर्पण केले तरी भगवंत ते फुुल आनंदाने स्वीकरतो.भगवंताला काहीच नाही तर रोज पाणी जरी अर्पण केले तरी तो ते आनंदाने स्वीकारतो, पण त्यात भक्ताची भाव भक्ती असायला हवी. सुदामाने आणलेली पोहयाची गाठोडी घेऊन त्या भक्तीच्या पोह्याची गाठ भगवंतांनी स्वत:च्या हाताने सोडली आणि मुठभर पोहे खाऊन तृप्त झाले, अशी अनेक उदाहरणे देता येतील जी भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. मनुष्याने स्वार्थ सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करून भगवंत भक्ती केल्यास मनुष्याचा स्वत:चा उत्कर्ष होईल. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता ही प्रेरणा दिली पाहिजे.-नाना महाराज कुलकर्णी,  पिंप्राळा

टॅग्स :Jalgaonजळगाव