शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

पहूरच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:34 IST

वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळापेठ व कसबे ग्रामपंचायतीकडून साडेबत्तीस कोटींचा प्रकल्प अहवाल दाखल

मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.पहूर गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पहूर पेठ व कसबे सामुदायिक पाणीपुरवठा समिती गठित झाली आहे. २०१५ पासून शासनस्तरावर समीतीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे प्रकल्प अहवाल सादर केला आहे. औरंगाबाद येथील अभियंता समीर जोशी यांच्याकडून दोन्ही गावात सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.स्वतंत्र शाखा अभियंता नियुक्ती ची मागणीया प्रकल्पाचे काम वेगाने होण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्ती करण्याची मागणी समिती अध्यक्ष बाबूराव घोंगडे, उपाध्यक्षा तथा पेठ येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, कसबे येथील सरपंच ज्योती शंकर घोंगडे, सचिव अरूण घोलप, उपसरपंच श्यामराव सावळे, उपसरपंच योगेश भडांगे, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, रामेश्वर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, दौलत घोलप, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, विवेक जाधव, पुंडलिक भडांगे, अ‍ॅड. एस.आर पाटील, अर्जुन लाहसे या समिती सदस्यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.पाणीटंचाईच्या झळादरवर्षी पहूर गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा जून अर्धा होऊनही वरूणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. मोतीआई धरणाच्या मृत साठ्यातून अल्पसा शिल्लक पाणीसाठ्यातून कसबे व पेठ गावाची तहान भागविताना ग्रामपंचायतींना दमछाक करावी लागत आहे. वेळेप्रसंगी छोट्या मोठ्या वादाच्या घटनांना दोन्ही गावच्या सरपंचाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेही महत्वाकांक्षी योजना लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाघूर धरणावरून पेठ व कसबे गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी समीतीच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, दोन्ही गावांतील सर्वेक्षणाचे कामपूर्ण केले आहे. त्याचबरोबर दोन्ही ग्रामपंचायतीकडून ३२ कोटी ४३ लाख निधीच्या प्रकल्पाचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे नुकताच दाखल केला आहे. या योजनेचे काम जलद गतीने होण्याकरिता स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्तीची मागणी समीतीकडून केली आहे. यासाठी जलसंपदा मंत्र्यांनीही मुख्य अभियंता नाशिक यांना आदेशित करून तातडीने नियुक्तीच्या सूचना दिल्या आहेत. -बाबूराव घोंगडे, पेठ व कसबे सामूहिक पाणीपुरवठा समिती, अध्यक्ष, पहूर 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJamnerजामनेर