शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जळगाव जिल्ह्यात खरीपाची ८० टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:44 IST

जोरदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली असली तरीही अमळनेर, धरणगावसह काही तालुक्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. धरणगाव व अमळनेर तालुक्यात मात्र जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतच पेरण्या झाल्या असल्याचे समजते.जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे त्याचा परिणाम पेरण्यांवर व पिकांच्या लागवड क्षेत्रावरही झाला आहे. पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरीही पावसाने हा उशिर भरून काढला आहे. त्यामुळेच मागील वर्षी आजच्या तारखेला २२.३ टक्के पाऊस झालेला असताना यंदा १९.३ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरीही धरणगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा, चाळीसगाव आदी तालुक्यांमध्ये अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील पेरण्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धरणगाव व अमळनेर तालुक्यातील पेरण्यांवर कमी पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला असून या तालुक्यांमध्ये जेमतेम ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. बोदवड, यावल, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर आदी तालुक्यांमध्ये पेरण्या पूर्णत्वाकडे आहेत. तर धरणगाव, अमळनेर तालुक्यात जेमतेम ५० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत.बोदवड तालुक्याची आघाडीबोदवड तालुक्यात कपाशीची १०६ टक्के पेरणी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण सरासरी ८० टक्क्यांच्या आसपास कपाशीची पेरणी आटोपली आहे. तर ज्वारीच्या पेरणीतही घट झाली आहे. बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जेमतेम ३० टक्क्यांच्या आतच झाली आहे. तर अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये कडधान्याच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव