शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

25 कोटींची कामे ठरविणार समिती

By admin | Updated: March 17, 2017 00:28 IST

नगरविकास विभागातर्फे परिपत्रक जारी : मनपाने पाठविलेला प्रस्ताव बारगळला

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या 25 कोटीच्या निधीसाठी मनपाने पाठविलेला प्रस्ताव आमदार सुरेश भोळे यांच्या मागणीवरून अडगळीत टाकत या निधीतून कामे करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीलाच कामे कोणामार्फत करावीत, हे ठरविण्याचे अधिकार असून आमदार भोळे यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे करण्याची विनंती पालकमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. निधी 31 मार्च  2018 र्पयत खर्च     करावा लागणार15 मार्च रोजी देखील आमदार सुरेश भोळे व चंदूलाल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी तत्काळ 25 कोटींचा निधी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत जळगाव महानगरपालिकेस वितरीत करण्याचे मंजूर केले. शासनाच्या नगरविकास विभागामार्फत तसे परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. जळगाव शहर मतदार संघासाठी मंजूर झालेला निधी 31 मार्च 2018 पूर्वी खर्च करावयाचा असून त्या माध्यमातून शहरातील प्रमुख गटारी, रस्ते, लहान पूल आणि इतर मुलभूत सुविधांचीच कामे करावयाची आहेत.भेदभाव केला नाही -आमदार भोळेयाबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मनपातील सत्ताधा:यांनी 25 कोटीचा प्रस्ताव पाठविताना विश्वासात घेतले नाही. वास्तविक या निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला होता. जर तो प्रस्ताव पाठविण्यापूर्वी दाखविला असता तर  त्या प्रस्ताव एक-दोन बदल सुचविले असते व आज ही वेळ आली नसती.  मात्र आधी झालेल्या रस्त्यांची कामे त्यात घेण्यात आलेली होती. डी-मार्टचा रस्ता किंवा असेच काही रस्ते समाविष्ट केलेले होते. मात्र आजही अनेक कॉलनी एरियात रस्ते, गटारी, पाणी आदी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. 60 टक्के गटारी झालेल्या नाहीत. त्यामुळे हे नागरिक ‘आम्ही कर भरत नाहीत का?’ म्हणून जाब विचारतात. तरीही त्याचे दखल घेतली जात नव्हती. मनपाला सांगूनही सहकार्य मिळत नाही. साधे खड्डे देखील बुजवत नाहीत. त्यामुळे 25 कोटीच्या निधीतून आता कॉलनी भागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठय़ाची कामे समाविष्ट असतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्र्हे करून प्रस्ताव आधीच दिला आहे. त्यात कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असला तरीही भेदभाव केलेला नाही. त्यात आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे काही बदल असल्यास ते सुचवतील. महापौरांना विनंती आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. विविध प्रश्नांवर बसून चर्चा करून निर्णय घेता येतील.  मनपाने सुचविलेली कामे दुस:या टप्प्यातआमदार भोळे म्हणाले की, मनपाने पाठविलेला प्रस्ताव रद्द केलेला नाही. त्यातील काही कामे या प्रस्तावात घेतली जातील. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणखी 25 कोटीचा निधी यानंतर देण्याचे मान्य केले आहे. त्यात उर्वरीत कामे घेतली जातील, असे सांगितले.  मनपाने हगणदरीमुक्तीचा केलेला दावा खोटा आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.