शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

साहित्य क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात शासन व जनता उदासीन - एकनाथराव खडसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:36 IST

ओबीसी साहित्य संमेलन उत्साहात

जळगाव : वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी साहित्य व साहित्यिकांना प्रोत्साहनाची आवश्यकता असताना दुर्दैवाने शासन व जनता हे दोन्ही घटक याप्रश्नी उदासीन आहेत अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित पहिल्या ओबीसी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना केली.ओबीसी फाउंडेशन आॅफ इंडिया आयोजित पहिल्या राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनाचे शहरातील कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे, महापौर सिमा भोळे, साहित्यिक प्रभाकर श्रावण चौधरी, दिवाकर चौधरी, आत्माराम माळी, स्वाती मोराळे, उद्योजक चंद्रकांत बेंडाळे, रत्नाकर मोराळे, तुषार वाघुळदे आदी होते. संमेलनाची सुरूवात सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडीने झाली.बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. दिंडीतील ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह २० ग्रंथांचे पूजन झाले. मेहरूण मधील श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम पथक दिंडीत सहभागी झाले होते. सभागृहात खडसे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन झाले.मान्यवरांचा सत्कारसाहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या सतीश कुबेर (धुळे), डॉ. किसन पाटील, डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी, प्रा. लतिका चौधरी (दोंडाईचा), डॉ. सतीश कराडे (नागपूर), गोकुळ बागुल, डॉ. प्रमोद महाजन, पांडुरंग सुतार, अभिनेत्री प्रियंका टोके (मुक्ताईनगर), डॉ. नितीन पाटील, प्रा. रमेश राठोड, प्रा. देवबा पाटील, डॉ.अभिजीत कवटकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.विविध सत्र उत्साहातओबीसी समाजाच्या प्रगतीत साहित्यिकांचे योगदान या विषयावर यावेळी परिसंवाद झाला यानंतर कथाकथन, गझल मुशायरा व कवीसंमेलनही यावेळी झाले. विविध सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन रत्नाकर मोराळे व तुषार वाघुळदे यांनी केले.मक्तेदारी संपलीएकनाथराव खडसे म्हणाले, राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज आहे. ३४३ जाती-जमातींचा त्यात समावेश आहे. कला, संस्कृती साहित्य या क्षेत्रात एकेकाळी एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. मात्र कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य अजरामर झाले, समाजाला एक दिशा देण्याचे काम या काव्याने केले. ओबीसी समाजातीलही अनेक व्यक्ती चांगले लिखाण करतात. या लिखाणाला लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतात. मात्र साहित्य क्षेत्रावर आज सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या प्रभावामुळे मोठे परिणाम झाले आहे. साहित्यिकांच्या लिखाणाला प्रोत्साहन मिळावे, प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. दुर्दैवाने शासन, जनता नेमकी याबाबत उदासीन असल्याबद्दलची नाराजी खडसे यांनी व्यक्त केली. आज दलित, विद्रोही विविध भाषिकांचे साहित्य संमेलन होते त्यामागे केवळ एकच हेतू असतो की साहित्यिकाचे साहित्य हे जनतेसमोर यावे त्यातून जागृती व्हावी.साहित्य समाजाचा हुंकारसाहित्य हे समाजातून येत असते. समुहाचा हुंकार घेऊन समाजाचे जगणे बनते. तर कधी ज्ञानदेवासारखे विश्वाला शांतीचे मागणे मागते. साहित्य ही कुणाची मक्तेदारी नसते अनुभवातून साहित्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन स्वागताध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ओबीसी समाजाने सामाजिक, शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या ओबीसींना आपल्या मानसिकतेत बदल करून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या संमेलनातून आपण साहित्य संस्कृती समृद्ध करत आहोत. आपल्या ज्ञाती बांधवांना सहकार्य करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव