शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात मनपाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:56 IST

लॉकडाऊनमध्ये परवानगी असतानाही कामे ठप्प : जेव्हा कामे करायची होती तेव्हा दुर्लक्ष

जळगाव : पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची समस्या निर्माण झाल्यानंतर आता ऐन पावसाळ्यात मनपा प्रशासनाकडून शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने रस्ते दुरुस्तीसह इतर कामांना परवानगी दिली असतानाही त्यावेळी रस्ते दरुस्तीच्या कामाला सुरुवात न करता ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सध्या मनपा प्रशासनाकडून होत आहे.शहरातील रस्त्यांची समस्या ही गेल्या दोन-तीन वर्षांपासून जळगावकरांना सहन करावी लागत आहे. गेल्यावर्षी रस्त्यांची समस्या अत्यंत बिकट झाल्यानंतर यावर्षी तरी ही समस्या मार्गी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, मनपाचे ढिसाळ नियोजन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील रस्त्यांची समस्या यावर्षी देखील मार्गी लागलेली नाही. रस्त्यांची दुरुस्ती ही नेहमी पावसाळ्याचा आधी केली जात असते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करत महापालिका रस्ते दुरुस्तीच्या कामापासून पळ काढत आहे. विशेष म्हणजे पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य शासनाने रस्त्यांचा कामांसह इतर विकासाच्या कामांना सुरुवात करण्याची परवानगी दिली होती. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मनपा प्रशासन झोपा झोडत होते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.पहिल्याच पावसात दाणादाण उडाल्यानंतर आली जागशहरातील रस्त्यांची समस्या ही दरवर्षाची आहे. मात्र, मनपाने याबाबत गांभिर्याने घेतले नाही. आता जून महिन्याचा पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनपाचे पितळ उघडे पडल्यानंतर मनपाला जाग आली आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास मनपाने केलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होईल. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर करण्यात आलेला खर्च वायाच जाण्याची भीती आहे. महापालिकेने जर समस्या मार्गी लावायचीच होती तर लॉकडाऊनच्या काळात कामांना सुरुवात करण्याची गरज होती असे मत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले.लॉकडाऊनच्या काळात मजुरांची समस्या असल्याने कामांना उशीर झाला असला तरी, काही भागात रस्ते दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. जितकी समस्या कमी होईल तितकी समस्या कमी करण्याचा प्रयत्न आहे.-भारती सोनवणे, महापौरमहापालिकेची स्थिती सध्या ‘अंधेरनगरी चौपट राजा’ अशी झाली आहे. डांबरने दुरुस्त केलेले रस्ते पावसाळ्यात टिकत नाही, अशा परिस्थितीत ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करणे म्हणजे मनपाच्या तिजोरी मुद्दामहून खाली करण्याचा प्रकार आहे. जर दुरुस्ती करायचीच होती तर एप्रिल व मे महिन्यात का केली नाही?-सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव