शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ऐन पावसाळ्यात मनपाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:56 IST

लॉकडाऊनमध्ये परवानगी असतानाही कामे ठप्प : जेव्हा कामे करायची होती तेव्हा दुर्लक्ष

जळगाव : पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची समस्या निर्माण झाल्यानंतर आता ऐन पावसाळ्यात मनपा प्रशासनाकडून शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने रस्ते दुरुस्तीसह इतर कामांना परवानगी दिली असतानाही त्यावेळी रस्ते दरुस्तीच्या कामाला सुरुवात न करता ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सध्या मनपा प्रशासनाकडून होत आहे.शहरातील रस्त्यांची समस्या ही गेल्या दोन-तीन वर्षांपासून जळगावकरांना सहन करावी लागत आहे. गेल्यावर्षी रस्त्यांची समस्या अत्यंत बिकट झाल्यानंतर यावर्षी तरी ही समस्या मार्गी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, मनपाचे ढिसाळ नियोजन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील रस्त्यांची समस्या यावर्षी देखील मार्गी लागलेली नाही. रस्त्यांची दुरुस्ती ही नेहमी पावसाळ्याचा आधी केली जात असते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करत महापालिका रस्ते दुरुस्तीच्या कामापासून पळ काढत आहे. विशेष म्हणजे पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य शासनाने रस्त्यांचा कामांसह इतर विकासाच्या कामांना सुरुवात करण्याची परवानगी दिली होती. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मनपा प्रशासन झोपा झोडत होते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.पहिल्याच पावसात दाणादाण उडाल्यानंतर आली जागशहरातील रस्त्यांची समस्या ही दरवर्षाची आहे. मात्र, मनपाने याबाबत गांभिर्याने घेतले नाही. आता जून महिन्याचा पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनपाचे पितळ उघडे पडल्यानंतर मनपाला जाग आली आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास मनपाने केलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होईल. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर करण्यात आलेला खर्च वायाच जाण्याची भीती आहे. महापालिकेने जर समस्या मार्गी लावायचीच होती तर लॉकडाऊनच्या काळात कामांना सुरुवात करण्याची गरज होती असे मत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले.लॉकडाऊनच्या काळात मजुरांची समस्या असल्याने कामांना उशीर झाला असला तरी, काही भागात रस्ते दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. जितकी समस्या कमी होईल तितकी समस्या कमी करण्याचा प्रयत्न आहे.-भारती सोनवणे, महापौरमहापालिकेची स्थिती सध्या ‘अंधेरनगरी चौपट राजा’ अशी झाली आहे. डांबरने दुरुस्त केलेले रस्ते पावसाळ्यात टिकत नाही, अशा परिस्थितीत ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करणे म्हणजे मनपाच्या तिजोरी मुद्दामहून खाली करण्याचा प्रकार आहे. जर दुरुस्ती करायचीच होती तर एप्रिल व मे महिन्यात का केली नाही?-सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव