शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा.... जळगाव जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची ७६१ कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:29 IST

३१ डिसेंबरपूर्वीच कार्यारंभ आदेश मिळाले असल्याने दिलासा, आमदार स्मिता वाघ यांच्या तांराकित प्रश्नावर स्पष्टीकरण

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना २०१८-१९ या आर्थिक वर्षातील निधीतून कार्यारंभ आदेश न देण्याचे तसेच शासन मान्यतेनंतरच निधी खर्च केला जावा, असे आदेश शासनाने काढल्या प्रकरणी आमदार स्मिता वाघ यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करू शकतात, असे उत्तर शासनाच्यावतीने देण्यात आल्याने जिल्ह्यातील ७६१ कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर आमदार वाघ यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेचा पाठपुरावा करीत निधी उपलब्ध करून दिला. मात्र त्यावेळीही व नंतरही या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप सुरूच राहिल्याने नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त ठरलेल्या काही योजनांना ज्या प्रमाणे स्थगिती दिली होती. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना २०१८-१९ या आर्थिक वर्षातील निधीतून कार्यारंभ आदेश न देण्याचे तसेच शासन मान्यतेनंतरच निधी खर्च केला जावा, असे आदेश शासनाने जानेवारीमध्ये काढले होते. या आदेशामुळे जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामच सुरू न झालेल्या ७५७, निविदा प्रक्रियेत असलेले १ व न्यायप्रविष्ट असलेल्या ३ अशा ७६१ कामांना फटका बसण्याची शक्यता होती. पर्यायाने ही कामे रद्द करावी लागणार असल्याचे संकेतही दिले जात होते.या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच आमदार स्मिता वाघ यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून या कामांविषयी माहिती विचारली होती. त्या वेळी शासनाच्यावतीने स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, या कामांना ३१ डिसेंबर २०१९पूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच या कामांना शासनामार्फत निधी उपलब्ध न झाल्यास सदर कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या योजनांबाबत जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊ शकतील, असे नाशिक विभागाचे उपायुक्त (रोहयो) यांनीही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव