शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

दिलासा...शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग गेल्या आठवडाभरापासून घटला आहे. शहरात सरासरी ७०० चाचण्या केल्या जात असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग गेल्या आठवडाभरापासून घटला आहे. शहरात सरासरी ७०० चाचण्या केल्या जात असून, आता यात बाधितांचे प्रमाण दीड टक्क्यांवर आले आहे. आठवडाभरापासून शहराची पॉझिटिव्हिटी ही पाच टक्क्यांच्या खाली आहे. यात कडक निर्बंध, नियम पाळणे ही कारणे आहेतच, यासह विषाणूची तीव्रता कमी झाल्याचाही हा परिणाम असू शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात.

शहरात गुरुवारी २२ बाधित आढळून आले आहेत. तर, २४ रुग्ण बरे देखील झाले आहेत. दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ८३ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाभरातच कोरोनाचा संसर्ग घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यात सध्या सर्वाधिक ८६० सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ६५३९ वर आली आहे. मृतांमध्ये एरंडोल, पारोळा, रावेर, भुसावळ या ठिकाणी प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्के

शहरातील एकूण ३२,५५४ रुग्णांपैकी ३१,४२७ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. हे प्रमाण ९६ टक्के आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहराचा रिकव्हरी रेट हा ३ टक्के अधिक आहे. शहरातील ५६४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण हे कमी झाले आहे.

दहा व्हेंटिलेटरचे लोकार्पण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड म्युकरमायकोसिस या कक्षाचे तसेच लहान मुलांच्या दहा व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी पावणेपाच वाजता होणार आहे. यावेळी आढावा बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

असा आठवडा

२१ मे चाचण्या ८३२, बाधित १३, प्रमाण १.५६ टक्के

२२ मे चाचण्या ९०८, बाधित २१, प्रमाण २.३१ टक्के

२३ मे चाचण्या ३६०, बाधित १३, प्रमाण ३.३३ टक्के

२४ मे चाचण्या ७२३, बाधित ३०, प्रमाण ४.१० टक्के

२५ मे चाचण्या ८००, बाधित २१, प्रमाण २.६२ टक्के

२६ मे चाचण्या ५०५, बाधित १८, प्रमाण ३.५६ टक्के

नागरिकांनी गाफील राहू नये

कोरोना कमी होतोय, असे समजून नागरिकांनी गाफील राहू नये, अन्यथा तिसऱ्या लाटेत उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञ सध्या देत आहेत. पहिल्या लाटेनंतर तसेच चित्र पाहायला मिळाले होते. दुसऱ्या लाटेत गंभीर होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, ते हळूहळू कमी झाले. मात्र, पुढील उद्रेक थांबवायचा असेल तर नागरिकांनी तीन नियम पाळणे गरजेो आहे.

कोट

पॉझिटिव्हिटी ही सरासरी ५ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. १८ मेपर्यंत साधारण ७ ते १० टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी होती. ती त्यानंतर कमी झालेली आहे. नागरिकांनी वैयक्तिक लॉकडाऊन ही संकल्पना पाळणे, त्यात तीन नियमांचे तंतोतंत पालन करणे, या बाबी पुढील धोके टाळू शकतात. सर्वांच्या सहभागातूनच ते शक्य होणार आहे.

- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा