शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

२५ दिवसात ८७६ बाटल्या संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याचे मध्यंतरी चित्र होते. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक होता. यात रक्तदात्यांनी ...

जळगाव : सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याचे मध्यंतरी चित्र होते. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक होता. यात रक्तदात्यांनी पुढे यावे, रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी केले होते. त्याला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील विविध संस्थांनी पुढाकार घेत तीन रक्तपेढ्यांमार्फत गेल्या पंचवीस दिवसात ८७६ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले आहे. यामुळे रक्तसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

कोरोनाकाळात शिबिरांवर मर्यादा असल्याने शिवाय दात्यांचेही प्रमाण कमी असल्याने रक्तसाठ्यावर मोठा परिणाम झाला होता. ऐनवेळी रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत होती. अशातच बरेच नियम शिथिल झाल्यानंतर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा रक्तसाठा वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातही या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सरासरी रोज एक कॅम्प आणि त्याद्वारे मोठा रक्तसाठा संकलीत केला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ११ डिसेंबर रोजी सर्व रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यावेळी आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा होता. त्यामुळे रक्तसंकलन वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या होत्या.

तीन रक्तपेढ्यांचा पुढाकार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय रक्तपेढीद्वारे ३८४, रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीद्वारे २८२, तर गोळवलकर रक्तपेढीद्वारे २१० बाटल्या रक्त या महिनाभराच्या कालावधीत संकलीत करण्यात आलेले आहेत.

पुरेसा साठा

रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत २४ डिसेंबरपर्यंत ६३५ बॅग्स

गोळवलकर रक्तपेढीत ४ डिसेंबरपर्यंत १५३ बॅग्स

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीत ८२ बॅग रक्तसाठा उपलब्ध आहे.

विविध कार्यक्रमांना रक्तदान शिबिरे

बबलू पिपरिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, किसान महाविद्यालय पारोळा, समस्त लाडवंजारी समाज मेहरुण, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र, कावेरी ऑटो मोबाइल। भारत पेट्रोलियम शेंदूर्णी, एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक, औष्णिक विद्युत केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आयटीआय आदी संस्था आणि कार्यक्रमानिमित्त ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली आहेत.