शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाण्याअभावी कॉक्रिटला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:34 IST

जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते.

ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद महामार्ग : ठेकेदारांनीच पुन्हा काम बंद पाडलेजोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही ठेकेदार ठामकाम बंद पडल्याने वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक त्रासरस्त्यावर निर्माण झालेय धुळीचे साम्राज्य

पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते. कामगारांना आश्वासन देऊन लवकरच पगार दिले जाईल, असे सांगून सोमवारी सकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून श्रीकृष्ण कंट्रक्शन यांनी महामार्गावर मुरूम दबाई, पूल, खडी वाहतूक, राख सप्लाय यासह छोटे-मोठे काम श्रीकृष्ण कन्सट्रक्शन यांनी घेऊन महामार्गावरील मुरूम टाकून दबाई करून काम पूर्ण करून गेल्या सहा-सात महिन्यांपासून कंपनीने मजुरांना देण्यासाठी ठेकेदारांना पैसे न दिल्यामुळे महामार्गाचे काम पुन्हा बंद पाडले. कंपनी आमचे पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे.श्रीकृष्ण कन्सट्रक्शन या ठेकेदाराचे ३५ लाख रूपयांचे ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे घेणे आहे. याशिवाय अक्षय पाटील-मगर, शुभम पाटील-आन्वीकर यांच्यासह पाच ते सहा ठेकेदारांचेही पैसे या कंपनीकडे अडकलेले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून काम बंद असल्यामुळे महामार्गावरील काँक्रिटचे रस्ते व पूल यावर पाणी न मारल्यामुळे या कामांना तडे गेल्याचे आढळून आले आहे.जोपर्यंत कंपनी पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशा भूमिकेत ठेकेदारांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण कुमार यांना ठामपणे सांगितले आहे.या भूमिकेवर ठेकेदार व मजूर ठाम असल्यामुळे याचा त्रास मात्र वाहनचालक यांना सोसावा लागत आहे. निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास वाहनधारकांसह ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर पाण्याचा मारा करणे आवश्यक असताना मजुरांअभावी निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नाही. परिणामी रस्त्याचा दर्जा खालावण्याची भीती निर्माण झाली आह़े़गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी नसल्याने रस्त्याला व नुकत्याच बांधकाम झालेल्या पुलांना तडे जात आहेत. याबाबत ग्रामस्थ व प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.पहूर ते वाकोद दरम्यान महामार्गाच्या रस्त्याचे खोदकाम थांबवून जि.प. सदस्य अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पहिले पाळधी ते नेरी दरम्यान सुरू असलेले काम पूर्ण करा. नंतर इकडे कामाला सुरुवात करा, अशा सूचना दिल्या. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला तर वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे व छोटे-मोठे अपघात होत आहे म्हणून तिकडील काम जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी बंद पाडले.गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आम्ही कंपनीकडे काम केलेले आहे. काम करीत असताना कंपनीने आमच्याकडून चांगल्या प्रकारचे काम करून घेतले, पण आज पैसे मागायला गेले असता कंपनीचे अधिकारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कंपनीकडे ३५ लाख रुपये थकलेले आहे व पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कंपनीचे कोणतेही काम कुठेही चालू दिले जाणार नाही.-शुभम पाटील-आन्वीकर, ठेकेदार

 

टॅग्स :highwayमहामार्गJamnerजामनेर