शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाण्याअभावी कॉक्रिटला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:34 IST

जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते.

ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद महामार्ग : ठेकेदारांनीच पुन्हा काम बंद पाडलेजोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही ठेकेदार ठामकाम बंद पडल्याने वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक त्रासरस्त्यावर निर्माण झालेय धुळीचे साम्राज्य

पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते. कामगारांना आश्वासन देऊन लवकरच पगार दिले जाईल, असे सांगून सोमवारी सकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून श्रीकृष्ण कंट्रक्शन यांनी महामार्गावर मुरूम दबाई, पूल, खडी वाहतूक, राख सप्लाय यासह छोटे-मोठे काम श्रीकृष्ण कन्सट्रक्शन यांनी घेऊन महामार्गावरील मुरूम टाकून दबाई करून काम पूर्ण करून गेल्या सहा-सात महिन्यांपासून कंपनीने मजुरांना देण्यासाठी ठेकेदारांना पैसे न दिल्यामुळे महामार्गाचे काम पुन्हा बंद पाडले. कंपनी आमचे पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे.श्रीकृष्ण कन्सट्रक्शन या ठेकेदाराचे ३५ लाख रूपयांचे ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे घेणे आहे. याशिवाय अक्षय पाटील-मगर, शुभम पाटील-आन्वीकर यांच्यासह पाच ते सहा ठेकेदारांचेही पैसे या कंपनीकडे अडकलेले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून काम बंद असल्यामुळे महामार्गावरील काँक्रिटचे रस्ते व पूल यावर पाणी न मारल्यामुळे या कामांना तडे गेल्याचे आढळून आले आहे.जोपर्यंत कंपनी पैसे देत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशा भूमिकेत ठेकेदारांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण कुमार यांना ठामपणे सांगितले आहे.या भूमिकेवर ठेकेदार व मजूर ठाम असल्यामुळे याचा त्रास मात्र वाहनचालक यांना सोसावा लागत आहे. निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास वाहनधारकांसह ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर पाण्याचा मारा करणे आवश्यक असताना मजुरांअभावी निर्माणाधीन रस्त्यावर पाणी मारले जात नाही. परिणामी रस्त्याचा दर्जा खालावण्याची भीती निर्माण झाली आह़े़गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी नसल्याने रस्त्याला व नुकत्याच बांधकाम झालेल्या पुलांना तडे जात आहेत. याबाबत ग्रामस्थ व प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.पहूर ते वाकोद दरम्यान महामार्गाच्या रस्त्याचे खोदकाम थांबवून जि.प. सदस्य अमित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पहिले पाळधी ते नेरी दरम्यान सुरू असलेले काम पूर्ण करा. नंतर इकडे कामाला सुरुवात करा, अशा सूचना दिल्या. संपूर्ण महामार्ग खोदून ठेवला तर वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे व छोटे-मोठे अपघात होत आहे म्हणून तिकडील काम जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी बंद पाडले.गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आम्ही कंपनीकडे काम केलेले आहे. काम करीत असताना कंपनीने आमच्याकडून चांगल्या प्रकारचे काम करून घेतले, पण आज पैसे मागायला गेले असता कंपनीचे अधिकारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कंपनीकडे ३५ लाख रुपये थकलेले आहे व पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कंपनीचे कोणतेही काम कुठेही चालू दिले जाणार नाही.-शुभम पाटील-आन्वीकर, ठेकेदार

 

टॅग्स :highwayमहामार्गJamnerजामनेर