शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपल्याने सर्व वाळू ठेके बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:06 IST

प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळूचोरी मात्र जोरात

जळगाव : वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असल्याने जिल्ह्यातील सर्व वाळू ठेके सोमवारी मध्यरात्रीपासून बंद होत असून आता नवीन लिलाव प्रक्रियेनंतरच वाळू उपसा सुरू होईल. सध्या देखील लिलाव झालेल्या १७ वाळू गटांपैकी जेमतेम ५ गटच सुरू होते. ते देखील बंद झाल्याने याआधी देखील प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली वाळूचोरी मात्र जोरात सुरू होणार आहे.जिल्ह्यातील ४० वाळू गटांना राज्याच्या पर्यावरण समितीची मंजुरी मिळाली होती. मात्र त्यापैकी जेमतेम १७ वाळू गटांचा दोन टप्प्यातील लिलाव प्रक्रियेनंतर ठेका गेला होता. तर न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रक्रिया रखडल्याने उर्वरीत वाळू गटांचा लिलाव रखडला. आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरल्याने या वाळूगटांना प्रतिसाद मिळणार नाही, हे गृहित धरून प्रशासनाने या वाळूगटांच्या लिलावाचा नाद सोडून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यासोबतच वाळूचोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अवैध डंपर्स होतात वैधमागील आठवड्यात खेडी ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ९ डंपर पकडले होते. त्यातील काही डंपर विना क्रमांकाचे होते. जळगाव तहसीलदारांनी पथकासह जाऊन व तालुका पोलिसांना सोबत नेऊन हे डंपर ताब्यात घेऊन तालुका पोलीस स्टेशनसमोर जमा केले होते. विना क्रमांकाचे डंपर आरटीओकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. मात्र खेडी अथवा आव्हाणे येथील वाळू गटाचा ठेका गेलेला नाही. तसेच लिलाव घेतलेल्या वाळू गटातून वाळू वाहतूक करण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक टाकून त्या पावत्या त्या ठेक्यातून वाळू नेणाऱ्या वाहनाच्या चालकाकडे देण्यात येतात. मात्र या पकडलेल्या वाहनांपैकी काही डंपर विनाक्रमांकाचे व नोंदणी क्रमांकाची खाडाखोड केलेले असतानाही त्यांच्या पावत्या वैध ठरवित ही वाहने सोडून देण्यात आली. नवीन वाळू धोरणानुसार अवैध वाळू वाहतूक करणाºया डंपरला अडीच लाखांचा दंड करण्यात येतो. ताब्यात घेतलेल्या नऊ डंपर्सला नियमानुसार २० ते २२ लाखांचा दंड आकारणे आवश्यक होते. मात्र या वाहनांकडे वैध पावत्या असल्याचे कारण देत हे डंपर्स सोडण्यात आले. त्यामुळे शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. शासनाचा महसूल दुसºयाच तिजोरीत गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता तर वाळूचे ठेके बंद झाल्याने वाळू चोरीला ऊत येणार असून या वाळूचोरांना पाठीशी घालणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावणार आहे. जिल्हाधिकाºयांकडून मात्र याकडे सोयीस्कर कानाडोळा होत आहे.हे वाळू गट झाले बंद...पर्यावरणाची संमती मिळालेल्या ४० वाळू गटांपैकी केवळ १७ वाळू गटांचाच लिलाव झाला होता. त्यापैकी जोगलखेडा, बेलव्हाळ-१, बेलव्हाळ-२, बेलव्हाळ-३ हे ठेके २९ सप्टेंबर रोजी, खापरखेडा ता.अमळनेरचा ठेका १४ सप्टेंबर रोजी, जामोद ता.जळगावचा ३० आॅगस्ट रोजी, माहिती ता.पाचोरा हा ठेका १५ आॅगस्ट रोजी, कुरंगी ता.पाचोरा हा ठेका २५ सप्टेंबर रोजी बंद झाला होता. तर आव्हाणी ता.धरणगाव, सावखेडा ता.जळगाव, बाभुळगाव ता.धरणगाव, बोहरे ता.अमळनेर, कलाली ता.अमळनेर हे ठेके ३० सप्टेंबरपासून बंद झाले आहेत. त्यामुळे आता पुढील लिलाव प्रक्रिया होईपर्यंत वाळू उपसा बंद राहणार आहे. या काळात झालेला सर्व उपसा हा अवैध असणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव