शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

आठ-आठ तास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून दररोज आठ-आठ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे एक दिवस दुरुस्तीचे कारण दिले जाते, मात्र इतर दिवस कोणतेही दुरुस्तीचे काम नसतानाही महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे जळगाव ग्रामीणमधील नागरिक वैतागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

महावितरणकडून मान्सूनच्या आधीच दुरुस्तीची कामे केली जात असतात. या कामांच्या वेळेस काही दिवसांसाठी महावितरणकडून भारनियमन केले जात असते; मात्र आता मान्सून सुरु झाल्यावरदेखील दररोज वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांदगाव, कुवारखेडा या गावांमध्ये नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर शिरसोलीसह वडली, वावडदा भागात देखील दिवसभरात अनेकवेळा विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. आव्हाणे, खेडी, वडनगरी या गावांमध्ये तर गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे आढळून आले आहे.

कोणतेही वादळ, पाऊस नसतानाही वीजपुरवठा खंडित का ?

सध्या महावितरणची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. कोणतेही वादळ किंवा जोरदार पाऊस नसतानाही काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच नियमित वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही रात्रभर विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. याबाबत नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला जातो तरीही महावितरणकडून ग्राहकांना अपेक्षित उत्तर दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे. यासह शेतीसाठी दिला जाणारा आठ तास पुरवठा देखील नियमित होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोट..

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. कोणतेही वादळ, पाऊस नसताना दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. तसेच रात्री देखील अनेकवेळा वीज ये-जा करत असते.

- जितेंद्र चौधरी, आव्हाणे

शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. दिवसभरात ८ ते ९ तास वीजपुरवठा केला जात आहे. महावितरणचे अधिकारी दुरुस्तीचे कारण सांगतात.

- स्वप्नील जाधव, फुपनगरी,