शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

आठ-आठ तास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून दररोज आठ-आठ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे एक दिवस दुरुस्तीचे कारण दिले जाते, मात्र इतर दिवस कोणतेही दुरुस्तीचे काम नसतानाही महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे जळगाव ग्रामीणमधील नागरिक वैतागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

महावितरणकडून मान्सूनच्या आधीच दुरुस्तीची कामे केली जात असतात. या कामांच्या वेळेस काही दिवसांसाठी महावितरणकडून भारनियमन केले जात असते; मात्र आता मान्सून सुरु झाल्यावरदेखील दररोज वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांदगाव, कुवारखेडा या गावांमध्ये नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर शिरसोलीसह वडली, वावडदा भागात देखील दिवसभरात अनेकवेळा विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. आव्हाणे, खेडी, वडनगरी या गावांमध्ये तर गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे आढळून आले आहे.

कोणतेही वादळ, पाऊस नसतानाही वीजपुरवठा खंडित का ?

सध्या महावितरणची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. कोणतेही वादळ किंवा जोरदार पाऊस नसतानाही काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच नियमित वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही रात्रभर विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. याबाबत नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला जातो तरीही महावितरणकडून ग्राहकांना अपेक्षित उत्तर दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे. यासह शेतीसाठी दिला जाणारा आठ तास पुरवठा देखील नियमित होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोट..

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. कोणतेही वादळ, पाऊस नसताना दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. तसेच रात्री देखील अनेकवेळा वीज ये-जा करत असते.

- जितेंद्र चौधरी, आव्हाणे

शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. दिवसभरात ८ ते ९ तास वीजपुरवठा केला जात आहे. महावितरणचे अधिकारी दुरुस्तीचे कारण सांगतात.

- स्वप्नील जाधव, फुपनगरी,