शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आठ-आठ तास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून दररोज आठ-आठ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे एक दिवस दुरुस्तीचे कारण दिले जाते, मात्र इतर दिवस कोणतेही दुरुस्तीचे काम नसतानाही महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे जळगाव ग्रामीणमधील नागरिक वैतागले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

महावितरणकडून मान्सूनच्या आधीच दुरुस्तीची कामे केली जात असतात. या कामांच्या वेळेस काही दिवसांसाठी महावितरणकडून भारनियमन केले जात असते; मात्र आता मान्सून सुरु झाल्यावरदेखील दररोज वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांदगाव, कुवारखेडा या गावांमध्ये नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर शिरसोलीसह वडली, वावडदा भागात देखील दिवसभरात अनेकवेळा विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. आव्हाणे, खेडी, वडनगरी या गावांमध्ये तर गेल्या काही दिवसांपासून सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे आढळून आले आहे.

कोणतेही वादळ, पाऊस नसतानाही वीजपुरवठा खंडित का ?

सध्या महावितरणची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. कोणतेही वादळ किंवा जोरदार पाऊस नसतानाही काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच नियमित वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही रात्रभर विजेचा लपंडाव हा सुरुच असतो. याबाबत नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला जातो तरीही महावितरणकडून ग्राहकांना अपेक्षित उत्तर दिले जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे. यासह शेतीसाठी दिला जाणारा आठ तास पुरवठा देखील नियमित होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोट..

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. कोणतेही वादळ, पाऊस नसताना दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. तसेच रात्री देखील अनेकवेळा वीज ये-जा करत असते.

- जितेंद्र चौधरी, आव्हाणे

शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. दिवसभरात ८ ते ९ तास वीजपुरवठा केला जात आहे. महावितरणचे अधिकारी दुरुस्तीचे कारण सांगतात.

- स्वप्नील जाधव, फुपनगरी,