शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 21:33 IST

अमळनेर पालिकेच्या पायऱ्यांवर महिलांचा ठिय्या : असुविधेमुळे प्रभाग सहामधील नागरिक त्रस्त

अमळनेर : शहरातील मिळचाळ- प्रभाग सहामध्ये शौचालयांची दुरवस्था झाली असून असुविधांमुळे रोगराईस सामोरे जावे लागत असल्याने परिसरातील महिलांनी थेट नगरपालिकेवर बुधवारी मोर्चा नेला. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी वैयक्तिक शौचालय योजनेतून नवीन बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा माघारी फिरला.गलवाडे रोड, शिवसमर्थ नगर, मिलचाळ, मुठे चाळ, धर्मशाळा परिसरात बऱ्याच दिवसांपासून साफसफाई केलेली नाही. शौचालयांच्या सेफ्टी टाक्यांची स्वच्छता नाही, भांडे तुटलेले आहेत, मैलाच्या टाक्या झाकलेल्या नाहीत, त्या परिसरात पथदिवे नसल्याने रात्री अंधार असतो. सेफ्टी टँकमध्ये पडण्याची भीती आहे, तसेच बºयाच वर्षांपासून असलेल्या नळांना तोट्या नसल्याने पाणी भरपूर प्रमाणात वाया जाते, त्यामुळे पाण्याचे डबके तयार होऊन डास व कीटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यास लागून गटारी तुडुंब भरल्याने लहान मुले व वृद्ध त्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्यांमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा नेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. काही वेळ महिलांनी पालिकेच्या पायºयांवर ठिय्या मांडला होता.मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी समस्येवर पर्याय म्हणून जुने शौचालय नादुरुस्त झाल्याने ते पाडून नागरिकांना वैयक्तिक शौचालय अनुदानातून ५ सीट शौचालय पालिकेच्या त्याच जागेवर बांधून देण्याचे सुचविले. त्याचा ताबा नागरिकांनाच देऊन त्याची देखभाल नागरिकांनीच करावी या उपायामुळे नागरिक समाधानी झाले. तसेच साफसफाईच्या व मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाºयांना दिल्या. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनीदेखील स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या. निवेदनावर मल्हारी आविले, हेमंत भोळे, दीपक जोशी, दिलीप नाईक, दत्ता नाईक, प्रशांत मालुसरे, राजू देशपांडे, सुरेश संनस, सचिन शिंदे, शेख मोहम्मद हुसेन, शेख मुस्तक अजीज, नंदकिशोर कापडणे, सुनील चव्हाण, महावीर मोरे, राजू ठाकूर, अजय गोरखे यांच्यासह ७० नागरिकांच्या सह्या आहेत.