शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:14 IST

उतारे मिळत नसल्याने कामे खोळंबली

ठळक मुद्देदोन दिवसात राज्यभर बंदचा इशाराउतारे मिळेना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कोणतेच उतारे मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दरम्यान, दोषींना अटक न केल्यास राज्यभर लेखणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 12 दिवसानंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे. 12 दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन व शासनाने कोणतीही दखल न घेण्यात आलेली नाही.

कामकाज ठप्पतलाठी बांधवांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी बांधवांमार्फत काम होत नसल्याने नागरिकांचे कामे खोळंबून विभागाचा महसूलही बुडून नुकसान होत आहे. उतारे मिळेनालेखणी बंदमुळे तलाठी कार्यालयेच बंद राहत आहे. दररोज अनेक जण या ठिकाणी कामानिमित्त येऊन माघारी परतत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना सातबारा उता:यासह विविध प्रकारचे नमुने, मालमत्तेवरील बोजांचे कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले आहे. या शिवाय शालेय विद्याथ्र्यासह नागरिकांना तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी लागणारे दाखलेही मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दोषींना अटक न केल्यास राज्यभरात लेखणी बंद आंदोलनदोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, सरचिटणीस जी.डी. बंगाळे यांच्यासह  राज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे व मारहाण झालेले तलाठी योगेश पाटील तसेच इतरांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी विभागीय आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याविषयी पदाधिका:यांना सांगितले. मात्र आंदोलनावर ठाम राहणार असून दोषींना अटक न झाल्यास दोन दिवसात राज्यभर लेखणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिका:यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तलाठी बांधव हे सरकारचेच काम करीत असतात. मात्र सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या पदाधिका:यांकडूनच मारहाण होत असेल तर आम्ही कोणाकडे पहायचे, असा सवाल जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ चालक, मालकांना अटक केली आहे, मात्र पोलिसांकडे आम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये ज्यांची नावे आहे, त्या सर्वाना अटक करावी अशी मागणी असल्याचेही ठाकूर म्हणाले. पोलिसांकडूनही या प्रकरणात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  तलाठी मारहाण प्रकरणात दोषींना अटक होत नाही तोर्पयच लेखणी बंद सुरूच राहणार आहे. मारहाणीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. - डी.एस. भालेराव, संघटक, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.