शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तलाठी बांधवांच्या लेखणी बंदमुळे नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:14 IST

उतारे मिळत नसल्याने कामे खोळंबली

ठळक मुद्देदोन दिवसात राज्यभर बंदचा इशाराउतारे मिळेना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कोणतेच उतारे मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दरम्यान, दोषींना अटक न केल्यास राज्यभर लेखणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 12 दिवसानंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे. 12 दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन व शासनाने कोणतीही दखल न घेण्यात आलेली नाही.

कामकाज ठप्पतलाठी बांधवांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्हाभरात कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी बांधवांमार्फत काम होत नसल्याने नागरिकांचे कामे खोळंबून विभागाचा महसूलही बुडून नुकसान होत आहे. उतारे मिळेनालेखणी बंदमुळे तलाठी कार्यालयेच बंद राहत आहे. दररोज अनेक जण या ठिकाणी कामानिमित्त येऊन माघारी परतत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना सातबारा उता:यासह विविध प्रकारचे नमुने, मालमत्तेवरील बोजांचे कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले आहे. या शिवाय शालेय विद्याथ्र्यासह नागरिकांना तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी लागणारे दाखलेही मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. दोषींना अटक न केल्यास राज्यभरात लेखणी बंद आंदोलनदोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, सरचिटणीस जी.डी. बंगाळे यांच्यासह  राज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डूबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे व मारहाण झालेले तलाठी योगेश पाटील तसेच इतरांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी विभागीय आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याविषयी पदाधिका:यांना सांगितले. मात्र आंदोलनावर ठाम राहणार असून दोषींना अटक न झाल्यास दोन दिवसात राज्यभर लेखणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिका:यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तलाठी बांधव हे सरकारचेच काम करीत असतात. मात्र सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या पदाधिका:यांकडूनच मारहाण होत असेल तर आम्ही कोणाकडे पहायचे, असा सवाल जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणात केवळ चालक, मालकांना अटक केली आहे, मात्र पोलिसांकडे आम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये ज्यांची नावे आहे, त्या सर्वाना अटक करावी अशी मागणी असल्याचेही ठाकूर म्हणाले. पोलिसांकडूनही या प्रकरणात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  तलाठी मारहाण प्रकरणात दोषींना अटक होत नाही तोर्पयच लेखणी बंद सुरूच राहणार आहे. मारहाणीचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. - डी.एस. भालेराव, संघटक, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.