शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:51 IST

टमाट्याचे भाव गडगडले

जळगाव : उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांचे भाव तर जवळपास दुपटीने वाढले असून इतर भाज्याही ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव गडगडले आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे.यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट ४००० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात तर कोथिंबीरने प्रती किलोसाठी शंभरी पार केली आहे. कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव असून ८० ते १२० रुपये प्रती किलोने ती विक्री होत आहे.कोथिंबीर खालोखाल वांग्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात ८०० ते २२०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. किरकोळ बाजारात ते दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.घरासह हॉटेल, नाश्त्याचे दुकान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी हिरवी मिरचीदेखील अधिक ‘तेज’ झाली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असणारी हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारतही मध्यम दर्जाची मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.टमाट्याचे भाव निम्म्यावरएरव्ही हिवाळ््यामध्ये टमाट्याची आवक वाढून त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. मात्र यंदा भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १००० ते १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव या आठवड्यात ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारात टमाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री होतआहेत.सध्याकॉलन्यांमध्येहीटमाटेविक्रीच्याहातगाड्यादिसतआहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव