शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:51 IST

टमाट्याचे भाव गडगडले

जळगाव : उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांचे भाव तर जवळपास दुपटीने वाढले असून इतर भाज्याही ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव गडगडले आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे.यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट ४००० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात तर कोथिंबीरने प्रती किलोसाठी शंभरी पार केली आहे. कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव असून ८० ते १२० रुपये प्रती किलोने ती विक्री होत आहे.कोथिंबीर खालोखाल वांग्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात ८०० ते २२०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. किरकोळ बाजारात ते दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.घरासह हॉटेल, नाश्त्याचे दुकान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी हिरवी मिरचीदेखील अधिक ‘तेज’ झाली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असणारी हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारतही मध्यम दर्जाची मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.टमाट्याचे भाव निम्म्यावरएरव्ही हिवाळ््यामध्ये टमाट्याची आवक वाढून त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. मात्र यंदा भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १००० ते १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव या आठवड्यात ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारात टमाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री होतआहेत.सध्याकॉलन्यांमध्येहीटमाटेविक्रीच्याहातगाड्यादिसतआहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव