शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

चोसाका परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

गत काळात कारखान्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने चोरटे आणि भामट्यांनी कारखान्यातील विविध प्रकारची सामग्री लंपास केलेली आहे. एवढेच नाही तर ...

गत काळात कारखान्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने चोरटे आणि भामट्यांनी कारखान्यातील विविध प्रकारची सामग्री लंपास केलेली आहे. एवढेच नाही तर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर भव्य असे श्री दत्ताचे मंदिर उभारलेले होते. या मंदिराचीही दुरवस्था झालेली होती. मात्र, तीन वर्षांनंतर अखेर सर्वपक्षीय नेते, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या प्रयत्नाने पुन्हा कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणार असल्याने व चाकांची धडधड सुरू होणार असल्याने परिसराला पुन्हा वैभव प्राप्त होणार आहे.

भाडेतत्त्वावर का असेना परंतु कारखाना सुरू होणार हे मात्र तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे. यासोबतच हजारो कामगारांना कारखाना सुरू झाल्यानंतर रोजगार उपलब्ध होणार आहे.

-----

प्रतिदिन अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता

साखर कारखान्याची प्रति दिवस अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. तीन पाळ्यांमध्ये जर नियमित कारखाना सुरू राहिला तर दररोज अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप होऊ शकतो. तसेच सहवीज प्रकल्पातून शेकडो युनिट दररोज वीज निर्माण होते. गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्यातील सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली वीज वितरण कंपनीला विकून कारखान्याला पैसेही मिळायचे आणि कारखान्याने वापरलेल्या विजचे बिल फेडून कारखान्याला पैसे मिळायचे. प्रति दिन अडीच हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने कार्यक्षेत्रातूनच ऊस उपलब्ध होत असतो. परिसरातही ऊसासाठी पोषक वातावरण असल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी कारखान्याने पाच ते सहा लाख टन ऊस एका हंगामात गाळप केलेला आहे.

-----

हजारो कामगारांना मिळणार रोजगार

कारखान्यात नियमित वेतन श्रेणीवर जवळपास दोनशे ते सव्वादोनशे कामगार कामास असतात. तसेच ऊस वाहतूक व ऊस तोडणी मजुरांपासून तर कारखाना सुरू झाल्यानंतर लहान मोठे उद्योग व्यवसाय करणारे असे एकूण जवळपास एक हजारांच्यावर बेरोजगारांना दररोज रोजगार उपलब्ध होणार आहे.

----

मोठ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र

चहार्डीसह परिसरात शेकडो एकर जमीन असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान ठरणार आहे. कारण मजुरांची वाढलेली मजुरी व जाणवणारा मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. अशा परिस्थितीत जर मोठ्या शेतकऱ्यांचे निम्म्याच्यावर क्षेत्र ऊस लागवडीत गुंतले तर उत्पन्नही भरमसाठ मिळू शकते. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना हा कारखाना वरदान ठरणार आहे तीच बाब डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी एकमुखी ठराव केलेला आहे.

---

सरासरी उतारा दहाच्या वर असणारी ऊसाची जात विकसित करणे आवश्यक

दरम्यान, यापूर्वी तीन-चार वर्षे सोडली तर या साखर कारखान्याचा ऊसातील साखरेचा सरासरी उतारा हा १० पेक्षा कमी आहे. म्हणून यापुढे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि कारखान्याचा साखर निर्माण करण्याचा सरासरी उताराही वाढेल अशी ऊसाची जात कारखाना परिसरात असलेल्या कारखान्याच्या शेतीत विकसित करण्याची गरज आहे.

----

चोपडा सहकारी साखर कारखान्यात जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांनी भाग भांडवल अडकविले आहे. भाग भांडवलदारांना सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या प्रकल्पातून मिळणारे लाभ दिले जाणेही आवश्यक आहे. यापूर्वी याच कारखान्याने भाग भांडवलदार सभासद शेतकऱ्यांना कमी दरात साखर उपलब्ध करून दिलेली आहे तर अनेक वेळा भेटवस्तूही दिल्या आहेत. म्हणून सहकारी तत्त्वावर चालवले जाणाऱ्या प्रकल्पांचे लाभ सभासदांना यापुढेही मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.