शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

दहा वर्षानंतरच प्रथमच मिरचीचा ‘ठसका’

By admin | Updated: March 29, 2017 18:36 IST

तब्बल दहा वर्षानंतर यंदा मिरचीची रेकॉर्डब्रेक अर्थात 52 कोटींची उलाढाल झाली आहे. तब्बल अडीच लाख क्विंटल मिरची यंदा खरेदी करण्यात आली.

52 कोटींची झाली उलाढाल : यंदा रेकॉर्डब्रेक अडीच लाख क्विंटल आवक

मनोज शेलार 
नंदुरबार, दि.29 : तब्बल दहा वर्षानंतर यंदा मिरचीची रेकॉर्डब्रेक अर्थात 52 कोटींची उलाढाल झाली आहे. तब्बल अडीच लाख क्विंटल मिरची यंदा खरेदी करण्यात आली. मिरची हंगाम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी मात्र, मिरची पथारींना जागेची अडचण सतावणार असल्यामुळे उलाढालीवर परिणामाची भिती आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
मिरचीचे आगार म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारात गेल्या दहा वर्षात मिरची मार्केट पुर्णत: कोलमडले होते. त्याला विविध कारणे होती. एकतर मिरचीवर येणा:या विविध रोगांमुळे लागवड कमी झाली. मिरचीचे क्षेत्र इतर नगदी पिकांनी व्यापले. भाव मिळत नसल्यामुळे शेतक:यांनी मिरची लागवडीकडे केलेले दुर्लक्ष यासह इतर कारणांचा समावेश होता. त्यामुळे कधीकाळी अडीच ते तीन लाख क्विंटल खरेदी-विक्री होणा:या येथील बाजार समितीत 70 हजार ते एक लाख क्विंटल दरम्यान मिरची उलाढालीवर समाधान मानावे लागत होते. यंदा मात्र गेल्या दहा वर्षाची भर निघाली आहे.
हंगामाच्या सुरुवातीपासूनच..
यंदा अगदी हंगामाच्या सुरुवातीपासूनच मिरचीची आवक वाढली होती. खरीप हंगामात ब:यापैकी झालेला पाऊस, मिरची पिकासाठी असलेले पोषक वातावरण आणि वाढलेले क्षेत्र यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच हिरवी मिरची बाजारात दाखल झाली होती. दैनंदिन तब्बल सातशे क्विंटल हिरवी मिरचीची आवक झाली होती. भाव देखील अवघा सहाशे ते सातशे रुपये क्विंटल होता. त्यामुळे हिरवी मिरची देखील व्यापा:यांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली होती. पहिल्यांदाच हिरव्या मिरचीच्या पथारी देखील पहावयास मिळाल्या होत्या. 
दहा वर्षानंतर..
चालू वर्षी मिरचीची आवक ही दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बाजार समितीने सांगितले. 2007-08 च्या हंगामानंतर यंदाच मिरचीने अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे. आणखी किमान 20 ते 25 हजार क्विंटल आवक गृहित धरली तर यंदा पावणे तीन लाख क्विंटलपेक्षा अधीक आवक नोंदली जाणार आहे.
50 कोटी पार
उलाढालीचा आकडा देखील 50 कोटी पार करून गेला आहे. आतार्पयत तब्बल 52 कोटींची उलाढाल झाली आहे. आणखी उलाढाल होण्याची शक्यता आहेच. गेल्या वर्षाचा विचार करता गेल्या वर्षी अवघी 90 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. त्यातून 27 कोटींची उलाढाल झाली होती. यंदा तिप्पट आवक व उलाढाल झाली आहे.
प्रक्रिया उद्योग
नंदुरबारात 10 नामांकित उद्योग असून इतर लहान-मोठय़ा उद्योगांची संख्या 20 च्या घरात आहेत. येथील नामांकित ब्रॅण्ड देशभरात प्रसिद्ध आहेत. पाच वर्षापूर्वी येथील मिरची आखाती देशातदेखील निर्यात करण्यात आली होती. मात्र, शासकीय अनास्था, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, बाजारतंत्र मिळविण्यात उद्योजकांची उदासीनता यामुळे येथील मिरची उद्योग काहीसा मागे पडला आहे. येथील उद्योजक वर्षभराचा साठा करून ठेवतात. येथे असलेल्या शीतकेंद्रांमध्ये ती मिरची साठविली जाते. प्रक्रिया उद्योगासाठी जेवढी लागेल तेवढी मिरची त्यातून काढली जाते. येथे  असलेल्या बहुतेक मिरची पथारी ह्या प्रक्रिया उद्योजकांच्याच आहेत. अशा ठिकाणी मिरची कोरडी करून ती शीतकेंद्रात साठविण्यासाठी ठेवली जात असते. 
मध्य प्रदेशची मिरची
यंदा बाजार समितीत नेहमीप्रमाणे मध्य प्रदेशची मिरचीदेखील दाखल झाली. अर्थात त्या भागातून ओली मिरचीची आवक कमी राहिली. परंतु कोरडी मिरचीची आवक ब:यापैकी झाली. वर्गवारीनुसार या मिरचीला साडेसहा ते साडेदहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. आता या मिरचीची आवकदेखील वातावरणातील बदलामुळे कमी झाली आहे. ठोक खरेदीदार तसेच मिरची प्रक्रिया उद्योग व्यावसायिक या मिरचीला पसंती देत असत. परंतू यंदा स्थानिक स्तरावरच मोठय़ा प्रमाणावर मिरची खरेदी केली गेली.
नोटा बंदीचाही फटका
मिरचीची उलाढाल आणखी एक ते दोन कोटींनी वाढली असती. परंतु नोटा बंदीच्या काळात मिरचीची उलाढाल पुर्णपणे ठप्प झाली होती. व्यापा:यांनी चलन टंचाईमुळे खरेदी बंद ठेवली होती. त्यामुळे शेतक:यांना स्वत:च शेत शिवारात ओली मिरची सुकवावी लागली होती. मिरची सुकविण्याचे तंत्र शेतक:यांना अवगत नसल्यामुळे व पुरेशी जागा नसल्यामुळे मिरचीची गुणवत्ता खराब राहिली. त्याचा फटका अर्थातच भाव मिळण्यात झाला. डिसेंबरपासून मात्र नियमित व्यवहार झाल्याने पुन्हा उलाढाल पूर्वपदावर आली होती.
सध्या मार्केट बंदच
सद्या मिरची मार्केट बंद आहे. मार्च अखेरमुळे व्यापा:यांना लेखा-जोखा सादर करणे, चलनासंदर्भातील समस्या आणि इतर कारणांमुळे व्यापा:यांनी दोन दिवसांपासून मिरची खरेदीबंद ठेवली आहे. आता 1 एप्रिलनंतरच मिरचीची खरेदी-विक्री सुरू होणार आहे. आणखी किमान 20 ते 25 हजार क्विंटल मिरची आवक होण्याचा अंदाज बाजार समितीला आहे.