शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

...अन् मुख्यमंत्र्यांच्या मार्गात आली मोठी अडचण; ऐनवेळी दौऱ्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 15:03 IST

राष्टÑवादीच्या बैठकीतही खड्ड्यांचा विषय

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शनिवारी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौºयातच बदल करण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांना या खड्डेमय रस्त्यातून न्यावे कसे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा राहिला व ऐनवेळी दौराच बदलविला. दुसरीकडे जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला व त्यांनी या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या दुखºया नसवर जणू बोट ठेवले आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांच्या दोन्ही नेत्यांना रस्त्याचा फटका बसल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल का ? नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरुस्तीची संधीच नाहीरस्त्यांची बिकट स्थिती असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोघेही प्रमुख शनिवारी शहरात आले. शुक्रवारी संध्याकाळी ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला व ते मुंबई येथून थेट जळगावला येणार असल्याचे ठरले.मुख्यमंत्र्याच्या जळगाव दौºयात ते विमानतळावरून जैन हिल्स येथे मोटारीने जाणार असल्याचे नियोजित होते. त्यासाठी या मार्गावर पोलीस यंत्रणाही तैनात करण्याचे नियोजन झाले. मात्र रस्त्याची बिकट स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना या मार्गाने नेणे योग्य होणार नाही म्हणून दौºयातच बदल करून त्यांना विमानतळावरून जैन हिल्स येथे हेलिकॉप्टरद्वारे न्यावे लागले.शरद पवारांची नाराजीदुसरीकडे जळगाव-औरंगाबाद रस्त्याबाबत शरद पवार यांनी चोपडा येथे तर जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘या मार्गाने येणे म्हणजे डॉक्टर सोबत ठेऊनच प्रवास करणे गरजेचे आहे’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.नेते एकाच प्रवासात असे म्हणत असतील तर जळगावकर किती वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या दौºयानंतरही या रस्त्याचे भाग्य उजळेल की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.समस्यांचा डोंगरजळगाव-औरंगाबाद रस्त्याची दुरवस्था असण्यासह शहरातील विविध विकास कामेही रखडले आहे. त्यात शहरांमधील रस्त्यांचीही बिकट स्थिती आहे. शहरातील या थांबलेल्या विकासाचा मुद्दा महापौर भारती सोनवणे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मांडत अतिरिक्त निधीची मागणी केली.राष्ट्रवादीच्या बैठकीतही ‘खड्डे’संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचा विषय निघाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जळगाव शहरात खड्ड्यांचा विषय गंभीर असल्याचे पवार यांच्यासमोर बोलून दाखविले. खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी बिकट स्थिती झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनीच शहरातील खड्डे बुजल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव