शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मुख्यमंत्र्यांच्या मार्गात आली मोठी अडचण; ऐनवेळी दौऱ्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 15:03 IST

राष्टÑवादीच्या बैठकीतही खड्ड्यांचा विषय

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शनिवारी तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौºयातच बदल करण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांना या खड्डेमय रस्त्यातून न्यावे कसे, असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा राहिला व ऐनवेळी दौराच बदलविला. दुसरीकडे जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला व त्यांनी या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या दुखºया नसवर जणू बोट ठेवले आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांच्या दोन्ही नेत्यांना रस्त्याचा फटका बसल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल का ? नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरुस्तीची संधीच नाहीरस्त्यांची बिकट स्थिती असताना राज्यातील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे दोघेही प्रमुख शनिवारी शहरात आले. शुक्रवारी संध्याकाळी ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला व ते मुंबई येथून थेट जळगावला येणार असल्याचे ठरले.मुख्यमंत्र्याच्या जळगाव दौºयात ते विमानतळावरून जैन हिल्स येथे मोटारीने जाणार असल्याचे नियोजित होते. त्यासाठी या मार्गावर पोलीस यंत्रणाही तैनात करण्याचे नियोजन झाले. मात्र रस्त्याची बिकट स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना या मार्गाने नेणे योग्य होणार नाही म्हणून दौºयातच बदल करून त्यांना विमानतळावरून जैन हिल्स येथे हेलिकॉप्टरद्वारे न्यावे लागले.शरद पवारांची नाराजीदुसरीकडे जळगाव-औरंगाबाद रस्त्याबाबत शरद पवार यांनी चोपडा येथे तर जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘या मार्गाने येणे म्हणजे डॉक्टर सोबत ठेऊनच प्रवास करणे गरजेचे आहे’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.नेते एकाच प्रवासात असे म्हणत असतील तर जळगावकर किती वर्षांपासून हा त्रास सहन करीत आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या दौºयानंतरही या रस्त्याचे भाग्य उजळेल की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.समस्यांचा डोंगरजळगाव-औरंगाबाद रस्त्याची दुरवस्था असण्यासह शहरातील विविध विकास कामेही रखडले आहे. त्यात शहरांमधील रस्त्यांचीही बिकट स्थिती आहे. शहरातील या थांबलेल्या विकासाचा मुद्दा महापौर भारती सोनवणे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मांडत अतिरिक्त निधीची मागणी केली.राष्ट्रवादीच्या बैठकीतही ‘खड्डे’संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही शहरातील खड्ड्यांचा विषय निघाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जळगाव शहरात खड्ड्यांचा विषय गंभीर असल्याचे पवार यांच्यासमोर बोलून दाखविले. खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी बिकट स्थिती झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनीच शहरातील खड्डे बुजल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव