शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येऊ नये : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:01 IST

संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता

ठळक मुद्देकेंद्राने कलम ३६८चा वापर करावाआत्महत्या करू नका

जळगाव : मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असून जळगावात मात्र मराठा समाजाने शांतता राखून संयम बाळगलेला असला तरीही स्फोटक परिस्थिती आहे. आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक असताना मुख्यमंत्री मतांचा जोगवा मागण्यासाठी जळगावात आल्यास मराठा समाजातील युवकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले. यावेळी डॉ.राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, अ‍ॅड. सचिन पाटील, ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, राजेश पाटील, नंदू पाटील, गोपाल दर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री २९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे ऐकीवात आहे. मराठा समाजाची विनंती आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरून महाराष्टÑात जाळपोळ व उद्रेकाचे वातावरण झाले आहे. प्रथम तो ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे.केंद्राने कलम ३६८चा वापर करावागोपाल दर्जी म्हणाले की, जिल्ह्यातील मराठा बांधवांनी अजूनही विध्वंसक कार्य केलेले नाही व करणारही नाही. कोणी समाजकंटक समाजाला अशा कृत्यांनी बदनाम करत असेल तर त्याला समाज उत्तर देईल. केंद्र सरकार कलम ३६८ चा वापर करून मराठा समाजाला सहज आरक्षण देऊ शकते. त्याचा विचार करावा, अशी मागणी केली.आत्महत्या करू नकामराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे प्रयत्न होत आहेत. मात्र कोणीही आत्महत्या करू नये. ज्यांनी समाजाला वेठीस धरले आहे, त्यांना पुरून उरा. २०वर्षांपासून हा लढा सुरू असल्याचे भिमराव मराठे यांनी सांगितले. जो संयम ठेवण्याचा सल्ला द्यायला जाईल, त्याच्यावरच समाजबांधवांचा रोष ओढावतो आहे....संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईलजळगाव शहरात मनपा निवडणूक असल्याने मतदान व आचारसंहितेचा विचार करून मराठा समाजाने शांतता व संयम बाळगला आहे. मात्र युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्री समस्या सोडविण्यासाठी येण्याऐवजी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील तर या संतप्त युवकांना समजावणे कठीण जाईल. शांतता भंग होईल. अनुचित प्रकार घडू शकतो, अशी शंका डॉ.राजेश पाटील यांनी व्यक्त केली.आमदारांचा राजीनाम्याचा विषय वैयक्तिकमराठा आरक्षणाच्या विषयावर जिल्ह्यातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी करणार का? या प्रश्नावर डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले की, राजीनामा देणे हा आमदारांचा वैयक्तिक व नैतिकतेचा विषय आहे.मुख्यमंत्र्यांनी सांत्वनासाठी जाण्याची गरज...भीमराव मराठे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी येण्याऐवजी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे या युवकाच्या घरी शिंदे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जायला हवे होते. या युवकाच्या घरी एकही शासकीय प्रतिनिधी गेलेला नाही.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव