शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू

By संजय पाटील | Updated: October 5, 2022 12:17 IST

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू.

अमळनेर (जळगाव) : तिच्या छातीत कळा येऊ लागल्या...लागलीच उलट्याही झाल्या...बोरी नदीला पाणी ...गावासाठी बोट उपलब्ध नाही ...नदीतूध बैलगाडी चालेना... अखेर तिला झोळीत टाकले ..तिला घेऊन पाच जणांनी नदी पार करून दिली...पण दुर्दैवाने दसऱ्याच्या दिवाशी सकाळी महिलेनं जगाचा निरोप घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील महिला उषाबाई रामलाल भिल (५३) यांचा मृत्यू झाला.

सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही. बोरी नदीवर पूल नाही. गावचे पुनर्वसन झाल्यामुळे विकास होत नाही. पुनर्वसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भवून देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय बालिकेचा  उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासन म्हणते १७ किमी वर अमळनेरला नगरपालिकेत बोट आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. १७ किमीवरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तासाच्या वर कालावधी लागतो.

दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडे तीन वाजता उषाबाई यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. उलट्याही झाल्या. उजाडण्याची वाट पाहिली गेली. दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती. गावातील चार पाच लोकांना बोलावले. झोळी तयार करून उषाबाईंना झोळीत बसवून चार पाच जणांनी नदी पार केली. तोपर्यन्त बराच कालावधी उलटला होता. अमळनेरला आणले प्रकृती अत्यवस्थ म्हणून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रशासनाने सात्री पुनर्वसनाची आवश्यक निधीची तरतूद करून तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याचा मार्ग त्वरित काढावा. आणखी किती बळी जाण्याचा प्रशासन वाट पाहत आहे?महेंद्र बोरसे,माजी सरपंच, सात्री ता. अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव