शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू

By संजय पाटील | Updated: October 5, 2022 12:17 IST

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू.

अमळनेर (जळगाव) : तिच्या छातीत कळा येऊ लागल्या...लागलीच उलट्याही झाल्या...बोरी नदीला पाणी ...गावासाठी बोट उपलब्ध नाही ...नदीतूध बैलगाडी चालेना... अखेर तिला झोळीत टाकले ..तिला घेऊन पाच जणांनी नदी पार करून दिली...पण दुर्दैवाने दसऱ्याच्या दिवाशी सकाळी महिलेनं जगाचा निरोप घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने सात्री येथील महिला उषाबाई रामलाल भिल (५३) यांचा मृत्यू झाला.

सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही. बोरी नदीवर पूल नाही. गावचे पुनर्वसन झाल्यामुळे विकास होत नाही. पुनर्वसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भवून देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय बालिकेचा  उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासन म्हणते १७ किमी वर अमळनेरला नगरपालिकेत बोट आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. १७ किमीवरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तासाच्या वर कालावधी लागतो.

दसऱ्याच्या दिवशी पहाटे साडे तीन वाजता उषाबाई यांच्या छातीत कळा येऊ लागल्या. उलट्याही झाल्या. उजाडण्याची वाट पाहिली गेली. दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती. गावातील चार पाच लोकांना बोलावले. झोळी तयार करून उषाबाईंना झोळीत बसवून चार पाच जणांनी नदी पार केली. तोपर्यन्त बराच कालावधी उलटला होता. अमळनेरला आणले प्रकृती अत्यवस्थ म्हणून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

प्रशासनाने सात्री पुनर्वसनाची आवश्यक निधीची तरतूद करून तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याचा मार्ग त्वरित काढावा. आणखी किती बळी जाण्याचा प्रशासन वाट पाहत आहे?महेंद्र बोरसे,माजी सरपंच, सात्री ता. अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव