शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुद्धिबळपटू भावाचे मार्गदर्शन अन् भाग्यश्रीच्या मेहनतीने कमावले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

जळगाव : लॉकडाऊनचा कठीण काळ, त्यातही सर्वच क्रीडा स्पर्धा बंद, प्रशिक्षकांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झालेले असतानाही जळगावच्या ...

जळगाव : लॉकडाऊनचा कठीण काळ, त्यातही सर्वच क्रीडा स्पर्धा बंद, प्रशिक्षकांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झालेले असतानाही जळगावच्या भाग्यश्री पाटील हिने तिचा मोठा भाऊ आणि बुद्धिबळपटू प्रतीक पाटील याचे मार्गदर्शन आणि परिश्रम या जोरावर अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनच्या १६ वर्षांआतील गटाचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून भाग्यश्री ही नाशिकला राहत आहे. १५ जून रोजीच या स्पर्धेचा निकाल समोर आला होता. मात्र अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन ही फेअरप्लेची तपासणी करण्यासाठी काही दिवस निकाल राखून ठेवते. त्यामुळे हा निकाल फेडरेशनने शुक्रवारी जाहीर केला. गेल्या दीड वर्षापासून भाग्यश्री ही कोणत्याही प्रशिक्षकाकडे जाऊन प्रशिक्षण घेऊ शकत नाही. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये स्पर्धादेखील होत नव्हत्या. त्यामुळे ती दिवसाचा काही वेळ बुद्धिबळ खेळण्यात घालवत होती. तीन महिने आधी एआयएसएफने या स्पर्धेची घोषणा केली. त्यामुळे भाग्यश्रीमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. मात्र खरी अडचण होती ती प्रशिक्षकाची. अशा काळात तिला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तिचा मोठा भाऊ आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या प्रतीक याने उचलली. तीला सातत्याने मार्गदर्शन केले. तसेच दोघांनी मिळून आंतरराष्ट्रीय फिडे मास्टर आणि जुन्या विश्व सामन्यांचा अभ्यास केला. कोणत्या खेळाडूने कोणत्या परिस्थितीत कोणती चाल रचली. याचे बारकावे पाहिले. ऑनलाइन आणि विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाग्यश्रीने सराव केला. बुद्धिबळाची संबंधित पुस्तके वाचली. सातत्याने सराव आणि अभ्यास याच जोरावर तीने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

कोट -

भाग्यश्रीने या आधी सात वर्षे आतील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. आता पुन्हा एकदा ती यंदाही जेतेपद मिळवेल, असा विश्वास होता. गेल्या तीन महिन्यात ती ज्या पद्धतीने तयारी करत होती. ते पाहून ती नक्कीच यश मिळवेल, याची खात्री होती. - प्रतीक पाटील, भाग्यश्रीचा भाऊ.