शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:15 IST

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती ...

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती देऊन जातो. चातुर्मास हा एक संस्कार आहे. ज्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोक, पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासच्या निमित्ताने मिळत असते. यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त आपल्या संस्कृती, परंपरा, मूल्यांचे जतन करूया. बऱ्याच ठिकाणी साधू संतांचे आपल्या नियोजित ठिकाणी येणे झाले. बºयाच साधू संतांचे चातुर्मास कोरोनामुळे बदलावे लागले.सर्वच धार्मिक वर्गासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. मुलांना जेस शाहेतून घरी आल्यानंतर होमवर्क किंवा स्वयंअध्ययन, वाचन करणे हे खूप महत्वाचे असते, त्याचप्रमाणे यावर्षीचा चातुर्मास सर्वांसाठीच होमवर्क व स्वयंअध्ययनाचा आहे. आपण या कालावधीत काय, काय करायला पाहिजे? हे आता स्वत:च ठरवून घ्यायचे आहे. चातुर्मासमधले पहिले कर्तव्य ‘जयणा’ म्हणजे यतना. जीवदया किंवा विवेकपूर्व आचरण असे म्हटले पाहिजे. ‘जयणा धम्मस्स जननी’ धर्माचा उगमच जीवदयेतून आणि विवेकातून होत असतो. चातुर्मासमध्ये जिवोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते. यासाठी आपल्याला चालताना वा बाकीचे सगळे व्यवहार करताना जितकी जास्तीत जास्त जीवरक्षा घडू शकते, त्यासाठी जागृत राहणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात लहान लहान किड्यांपासून तर अनेक प्रकारचे जीवजंतू जमीन, वातावरणात फिरत असतात. आजच्या कोरोनासारख्या स्थितीत जर हा मुद्दा विवेक विशेष महत्वाचा आहे. आपण स्वत: सुरक्षित राहून बाकीच्या जीवांनासुध्दा आपल्यामुळे त्रास होणार नाही, यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. जसे वर्षाऋतुमध्ये वातावरण आर्द्र असते, आपल्या मनालासुध्दा करूणेनं आर्द्र बनवण्याची प्रेरणा घेऊन हा चातुर्मास काळ आलेला आहे.- श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर प.पू. महेंद्रऋषीजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव