शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:28 IST

जळगावच्या प्रवाशाला संतापजनक अनुभव

ठळक मुद्दे नांदेड-बिकानेर एक्सप्रेस पालनपुरमार्गे न जाता गेली दुसऱ्याच मार्गाने, रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार

जळगाव : जळगावमार्गे जोधपूरला जाणारी नांदेड-बिकानेर एक्सप्रेस पालनपुरमार्गे जोधपूरला न जाता अन्य मार्गाने नेऊन प्रवाशांना नागौरला उतरविण्यात आले. विशेष म्हणजे बदलण्यात आलेल्या मार्गाबद्ल प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. शेवटी नागौरला उतरुन प्रवाशांना दुसºया वाहनाने जोधपूरला जावे लागल्याचा प्रकार १ जानेवारी रोजी घडला.जळगाव येथील साहित्यिक सतीश जैन यांना रेल्वेच्या या मनमानी कारभाराचा फटका बसला. त्यामुळे त्यांच्यासह आई-वडिल व कुटुंबाचे हाल झाले.या संदर्भात सविस्तर असे की, ३१ जानेवारी रोजी जळगावचे सतीश जैन हे जोधपूरला जाण्यासाठी( गाडी क्रमांक-१७६२४ ) नांदेड बिकानेर एक्सप्रेस या गाडीत बसले. सुरतपर्यंत हे सर्व प्रवासी गाडीत जागे होते. सकाळी या प्रवाशांना रतलाम स्टेशनावर गाडी थांबलेली दिसली. या गाडीच्या मार्गावर कुठेही रतलाम स्टेशन येत नसल्याने, या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांनी तात्काळ दुरध्वनीवरुन रेल्वेच्या चौकशी केंद्राकडे चौकशी केली. यावर त्यांना गाडी तिच्या मार्गावर योग्य जात असल्याचे उत्तर मिळाले, तसेच या प्रवाशांना जवळील स्टेशनवर संपर्क साधण्याची सूचना केली.यानंतर गाडी अजमेर स्टेशनला आल्यावर या प्रवाशांनी स्टेशनवर चौकशी केली असता या ठिकाणी त्यांना गाडीच्या मार्गाबद्दल कुठलीही माहिती मिळाली नाही. पुढे फुलोरा स्टेशनवर गाडी आल्यावर या प्रवाशांनी चहा विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याने ही गाडी जोधपूरला जात नसल्याचे सांगितल्यावर, प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध माणसे, महिला पुरुष व लहान मुलेदेखील होते. गाडी चुकीच्या मार्गाने जात असल्यामुळे या २० ते २५ प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे गाडीतील बहुतांश प्रवासी खाली उतरुन गेले होते.हे प्रवासी जळगावहून गाडीत बसल्यावर तपासणीसाठी आलेल्या तिकीट निरीक्षकानेदेखील ही गाडी जोधपूरला जाणार नसल्याची कुठलीही माहिती दिली नाही. यानंतर ही गाडी रात्री आठच्या सुमारास नागौर स्टेशनला आली. या ठिकाणी तक्रार देण्यासाठी प्रवाशी स्टेशन मास्तरकडे गेले असता, स्टेशन मास्तरांनी तक्रार पुस्तक देण्यास टाळाटाळ करुन प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली. रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविषयी प्रवाशांती तीव्र संताप व्यक्त केला आहे.कडक आवाजात बोलल्यावर मिळाले तक्रार पुस्तक1 हे प्रवासी स्टेशन मास्तरकडे झालेल्या त्रासाबद्दल तक्रार करण्यासाठी गेले असता, स्टेशन मास्तराने त्यांचे काहीच ऐकुन न घेता पुस्तक देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झाले होते. यावेळी सतीश जैन हे स्टेशन मास्तराशी कडक आवाजात बोलल्यावर तक्रार पुस्तक देण्यात आले.2 दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जैन व इतर प्रवाशांचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. गाडीच्या मार्गावरील असलेल्या तांत्रिक अडचणी संदर्भात या प्रवाशांना जळगाव स्थानकावर तिकीट निरीक्षकाकडूनही कुठलीही माहिती मिळाली नाही. गेल्या १४ वर्षांपासून हे प्रवासी जळगावहुन नेहमी जोधपुरला जात असतांना, असा त्रास या पूर्वी कधीही सहन करावा लागला नव्हता.यामुळे एका प्रवाशाची तब्येत देखील बिघडली.3 ऐन थंडीत जळगावच्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.