शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

जळगाव-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. ...

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे जळगाव ते मुंबई विमानसेवा पुरविण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे, कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात विमान कंपनीतर्फे विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे ही सेवा एक महिना बंद ठेवण्यात आली होती. मात्र, विमानाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यामुळे, १४ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी मुंबईहून जळगाव इतके प्रवासी जळगावला आले व जळगावहून इतके प्रवासी मुंबईला रवाना झाले, तर मुंबईहून इतके प्रवासी जळगावला आले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून विमानाच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.

इन्फो :

असे आहे सुधारित वेळापत्रक

विमान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरू असल्यामुळे, दर बुधवारी व शनिवारी अहमदाबादहून जळगावसाठी दुपारी दोन वाजता विमान निघणार आहे. जळगावला हे विमान साडेतीन वाजता आल्यानंतर, या ठिकाणाहून मुंबईसाठी पावणे चार वाजता निघून, मुंबईला सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून साडेपाच वाजता निघून, जळगावला पावणे सात वाजता येणार आहे आणि जळगावहून पुन्हा अहमदाबादसाठी सायंकाळी सव्वा सात वाजता निघणार आहे.

तसेच या विमानसेवेच्या रविवारच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दर रविवारी हे विमान जळगावसाठी अहमदाबादहून सकाळी पावणे दहा वाजता निघून, जळगावला सव्वा अकरा वाजता येणार आहे, तर जळगावहून मुंबईसाठी पावणे बारा वाजता निघून, मुंबईला एक वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून दीड वाजता निघून जळगावला पावणे तीन वाजता येणार आहे आणि जळगावहून सव्वा तीन वाजता अहमदाबादकडे रवाना होणार आहे.

इन्फो :

नाईट लॅडिंगमुळे रात्रीची सेवा

जळगाव विमानतळावर पूर्वी नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्यामुळे, अनेकवेळा विमान जळगावला न थांबता अहमदाबादला रवाना व्हायचे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या वर्षापासून जळगाव विमानतळावर नाईट लॅंडिंग झाल्यामुळे, विमान कंपनीतर्फे विमानाच्या वेळापत्रकात बदल करून, मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी येणारे विमान सायंकाळी पावणे सात वाजता येणार आहे, तर सायंकाळी जळगावहून सव्वा सात वाजता अहमदाबादला रवाना होणार आहे. दरम्यान, नाईट लॅडिंगच्या सुविधेमुळे मुंबईहून जळगावला यायला विमानाला उशीर झाला तरी हे विमान नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे जळगावला उतरविण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. यामुळे प्र‌‌वाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.