शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. ...

जळगाव : तांत्रिक कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असलेली जळगाव ते मुंबईची विमानसेवा १४ जुलैपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथील ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीतर्फे जळगाव ते मुंबई विमानसेवा पुरविण्यात येत आहे. उड्डाण योजने अंतर्गंत ही सेवा असल्यामुळे, कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा नियमित सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात विमान कंपनीतर्फे विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे ही सेवा एक महिना बंद ठेवण्यात आली होती. मात्र, विमानाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यामुळे, १४ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी मुंबईहून जळगाव इतके प्रवासी जळगावला आले व जळगावहून इतके प्रवासी मुंबईला रवाना झाले, तर मुंबईहून इतके प्रवासी जळगावला आले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपनीतर्फे बुधवारपासून विमानाच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.

इन्फो :

असे आहे सुधारित वेळापत्रक

विमान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरू असल्यामुळे, दर बुधवारी व शनिवारी अहमदाबादहून जळगावसाठी दुपारी दोन वाजता विमान निघणार आहे. जळगावला हे विमान साडेतीन वाजता आल्यानंतर, या ठिकाणाहून मुंबईसाठी पावणे चार वाजता निघून, मुंबईला सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून साडेपाच वाजता निघून, जळगावला पावणे सात वाजता येणार आहे आणि जळगावहून पुन्हा अहमदाबादसाठी सायंकाळी सव्वा सात वाजता निघणार आहे.

तसेच या विमानसेवेच्या रविवारच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दर रविवारी हे विमान जळगावसाठी अहमदाबादहून सकाळी पावणे दहा वाजता निघून, जळगावला सव्वा अकरा वाजता येणार आहे, तर जळगावहून मुंबईसाठी पावणे बारा वाजता निघून, मुंबईला एक वाजता पोहोचणार आहे, तर मुंबईहून दीड वाजता निघून जळगावला पावणे तीन वाजता येणार आहे आणि जळगावहून सव्वा तीन वाजता अहमदाबादकडे रवाना होणार आहे.

इन्फो :

नाईट लॅडिंगमुळे रात्रीची सेवा

जळगाव विमानतळावर पूर्वी नाईट लॅंडिंगची सुविधा नसल्यामुळे, अनेकवेळा विमान जळगावला न थांबता अहमदाबादला रवाना व्हायचे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या वर्षापासून जळगाव विमानतळावर नाईट लॅंडिंग झाल्यामुळे, विमान कंपनीतर्फे विमानाच्या वेळापत्रकात बदल करून, मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी येणारे विमान सायंकाळी पावणे सात वाजता येणार आहे, तर सायंकाळी जळगावहून सव्वा सात वाजता अहमदाबादला रवाना होणार आहे. दरम्यान, नाईट लॅडिंगच्या सुविधेमुळे मुंबईहून जळगावला यायला विमानाला उशीर झाला तरी हे विमान नाईट लँडिंगच्या सुविधेमुळे जळगावला उतरविण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. यामुळे प्र‌‌वाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.