शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 14:53 IST

स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभ

भुसावळ : आजच्या परिस्थितीत चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झुकलेले आहे. आपल्या आजूबाजूला नेहमीच नकारात्मक गोष्टी ऐकण्यास व पहावयास मिळते. यामुळे आपले मनदेखील नकारात्मक होऊन आपल्या मनात द्वंद सुरू होत असतात. मग जीवनात दु:ख येते. या दु:खाला हरवायचे असेल तर मन प्रसन्न ठेवले पाहिजे. स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प व समारोपीय व्याख्यान परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी समाजमनावर होणाऱ्या वाईट परिणामांना घालवण्यासाठी व जीवन आनंदी करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वजण घरामध्ये लॉकडाऊन झाले होते. या सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जावा या दृष्टिकोनातून विविध विचारवंतांची व्याख्याने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजित करण्यात आली.प्रोजेक्ट सेक्रेटरी संजीव भटकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीदिली. बारावे पुष्प जनार्दन हरीजी महाराजांनी गुंफले. त्यांचा परिचय प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी करून दिला.यावेळी बोलताना जनार्दन महाराज म्हणाले की, जीवन जगत असताना मनामध्ये द्वंद सुरू असते. हे द्वंद्व संपवायचे असेल तर चांगल्या गोष्टी, सकारात्मक विचार केले पाहिजे. यासाठी आपले मन शांत करून प्रसन्न कसे असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी होतात. मनोबल वाढवले पाहिजे. जीवनातील हे युद्ध जिंकण्यासाठी मनोबल वाढणे आवश्यक आहे. जीवन जगण्याचा मंत्र समजला पाहिजे. मनाला स्थिर करण्यासाठी साधना केली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर दु:ख मानवनिर्मित असून आनंद ईश्वरनिर्मित आहे. सुखदु:ख सम असले पाहिजे. सकारात्मकतेसाठी स्वत:पासून सुरुवात करा. अंधश्रद्धेने मनोवृत्ती वाढू शकत नाही. घरात प्रेम, जिव्हाळा नात्यात असले पाहिजे कुटुंबामध्ये संवाद घडवून विवाद टाळले पाहिजे. संकुचित मन न ठेवता मनाचा मोठेपणा ठेवा. चांगले आचरण करा. आपल्या अंगी त्याग श्रद्धा प्रेम असले पाहिजे. एखाद्या चित्रात रंग भरल्यानंतर जसे सुंदर दिसते तसेच आपल्या जीवनातदेखील आपण रंग भरले पाहिजे. अडचणींवर मात करत आपण मार्गक्रमण केले पाहिजे. क्षमा करणे हे एक मोठेपण असून यामुळेदेखील दु:खाची तीव्रता कमी होते. महत्त्वाकांक्षा, सन्मान, लोभी वृत्तीचा त्याग करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकदेखील समजून घेतला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे स्वत:चे कुटुंबाचे व समाजाचे जीवन आनंदी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे यांनी, तर आभार प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्लबचे सेक्रेटरी राम पंजाबी व प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभकोरोनाच्या काळामध्ये आॅनलाइन झूम अ‍ॅप व फेसबुक पेज लाईव्हवरून सुरू व्याख्यानमाला घेण्यात आली. सर्वत्र नकारात्मक भूमिका असताना व कुटुंबामध्ये कलह कमी करण्यासाठी आनंदी जीवनासाठी या व्याख्यानमालेला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी वक्ते संवाद साधत होते.या व्याख्यांमध्ये विविध विचारवंतांनी आपले विचार मांडले आणि या विचारांचा लाभ महाराष्ट्राभरातून २८ हजारावर श्रोत्यांनी घेतला. ही सर्व व्याख्याने रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेजवर उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ