शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 14:53 IST

स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभ

भुसावळ : आजच्या परिस्थितीत चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झुकलेले आहे. आपल्या आजूबाजूला नेहमीच नकारात्मक गोष्टी ऐकण्यास व पहावयास मिळते. यामुळे आपले मनदेखील नकारात्मक होऊन आपल्या मनात द्वंद सुरू होत असतात. मग जीवनात दु:ख येते. या दु:खाला हरवायचे असेल तर मन प्रसन्न ठेवले पाहिजे. स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प व समारोपीय व्याख्यान परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी समाजमनावर होणाऱ्या वाईट परिणामांना घालवण्यासाठी व जीवन आनंदी करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वजण घरामध्ये लॉकडाऊन झाले होते. या सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जावा या दृष्टिकोनातून विविध विचारवंतांची व्याख्याने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजित करण्यात आली.प्रोजेक्ट सेक्रेटरी संजीव भटकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीदिली. बारावे पुष्प जनार्दन हरीजी महाराजांनी गुंफले. त्यांचा परिचय प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी करून दिला.यावेळी बोलताना जनार्दन महाराज म्हणाले की, जीवन जगत असताना मनामध्ये द्वंद सुरू असते. हे द्वंद्व संपवायचे असेल तर चांगल्या गोष्टी, सकारात्मक विचार केले पाहिजे. यासाठी आपले मन शांत करून प्रसन्न कसे असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी होतात. मनोबल वाढवले पाहिजे. जीवनातील हे युद्ध जिंकण्यासाठी मनोबल वाढणे आवश्यक आहे. जीवन जगण्याचा मंत्र समजला पाहिजे. मनाला स्थिर करण्यासाठी साधना केली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर दु:ख मानवनिर्मित असून आनंद ईश्वरनिर्मित आहे. सुखदु:ख सम असले पाहिजे. सकारात्मकतेसाठी स्वत:पासून सुरुवात करा. अंधश्रद्धेने मनोवृत्ती वाढू शकत नाही. घरात प्रेम, जिव्हाळा नात्यात असले पाहिजे कुटुंबामध्ये संवाद घडवून विवाद टाळले पाहिजे. संकुचित मन न ठेवता मनाचा मोठेपणा ठेवा. चांगले आचरण करा. आपल्या अंगी त्याग श्रद्धा प्रेम असले पाहिजे. एखाद्या चित्रात रंग भरल्यानंतर जसे सुंदर दिसते तसेच आपल्या जीवनातदेखील आपण रंग भरले पाहिजे. अडचणींवर मात करत आपण मार्गक्रमण केले पाहिजे. क्षमा करणे हे एक मोठेपण असून यामुळेदेखील दु:खाची तीव्रता कमी होते. महत्त्वाकांक्षा, सन्मान, लोभी वृत्तीचा त्याग करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकदेखील समजून घेतला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे स्वत:चे कुटुंबाचे व समाजाचे जीवन आनंदी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे यांनी, तर आभार प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्लबचे सेक्रेटरी राम पंजाबी व प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभकोरोनाच्या काळामध्ये आॅनलाइन झूम अ‍ॅप व फेसबुक पेज लाईव्हवरून सुरू व्याख्यानमाला घेण्यात आली. सर्वत्र नकारात्मक भूमिका असताना व कुटुंबामध्ये कलह कमी करण्यासाठी आनंदी जीवनासाठी या व्याख्यानमालेला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी वक्ते संवाद साधत होते.या व्याख्यांमध्ये विविध विचारवंतांनी आपले विचार मांडले आणि या विचारांचा लाभ महाराष्ट्राभरातून २८ हजारावर श्रोत्यांनी घेतला. ही सर्व व्याख्याने रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेजवर उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ