शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

By admin | Updated: January 24, 2017 01:34 IST

संरक्षण राज्यमंत्री : दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानने केली चंदूची मुक्तता

जळगाव : खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यांच्या लष्कराकडून  वैद्यकीय चाचणीसह काही औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर चंदू कुटुंबीयांना भेटू शकेल अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानात गेला होता. चंदू परत यावा यासाठी खान्देशच नव्हे तर देशभरातील नागरिकांची अपेक्षा होती. आतार्पयतचा इतिहास असा आहे की पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान हा कधीही परत आलेला नाही. यामुळे सर्वच जण चिंतीत होते. आपण ज्या वेळी खान्देशात येत होतो त्यावेळी लहानांपासून मोठय़ांर्पयत सर्वजण चंदू केव्हा भारतात येईल, अशी विचारणा करीत होते. चंदूच्या सुटकेसाठी आम्ही संरक्षण मंत्रालयामार्फत प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला पाकिस्तानने चंदू आमच्याकडे नाही, चौकशी सुरु आहे असे सांगत झुलवित ठेवले. मात्र विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालयामार्फत आम्ही आंतरराष्ट्रीयस्तरावर दबाव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी संवेदनशील होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान डीजीएमओ कडून सकारात्मक प्रतिसाद            मिळाला. शनिवारी दुपारी 3 वाजता पाकिस्तानने चंदू चव्हाण याला वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.पाकिस्तान मधून परत आल्यानंतर चंदू याच्या लष्कराच्या नियमानुसार वैद्यकीय तपासणीसह काही औपचारिक चौकशी पूर्ण होईल. त्यानंतर काही दिवसात तो कुटुंबियांना भेटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवान व खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव महानगर भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा भाजपा कार्यालयात पदवीधर मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील यांची प्रचार सभा व जिल्हा पदाधिका:यांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, सुभाष शौचे, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.  चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविल्याबद्दल जळगाव महानगर भाजपातर्फे अभिनंदनाचा ठराव माजी             नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.  भाजपाने केंद्रात व राज्यात बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. मात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी कायदे            होतात त्या विधान परिषदेत अजूनही आपण अल्पमतात आहोत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघामधील भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी          ही प्रत्येक कार्यकत्र्यावर असल्याचे भामरे यांनी           सांगितले.