शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

By admin | Updated: January 24, 2017 01:34 IST

संरक्षण राज्यमंत्री : दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानने केली चंदूची मुक्तता

जळगाव : खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यांच्या लष्कराकडून  वैद्यकीय चाचणीसह काही औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर चंदू कुटुंबीयांना भेटू शकेल अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. 29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानात गेला होता. चंदू परत यावा यासाठी खान्देशच नव्हे तर देशभरातील नागरिकांची अपेक्षा होती. आतार्पयतचा इतिहास असा आहे की पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान हा कधीही परत आलेला नाही. यामुळे सर्वच जण चिंतीत होते. आपण ज्या वेळी खान्देशात येत होतो त्यावेळी लहानांपासून मोठय़ांर्पयत सर्वजण चंदू केव्हा भारतात येईल, अशी विचारणा करीत होते. चंदूच्या सुटकेसाठी आम्ही संरक्षण मंत्रालयामार्फत प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला पाकिस्तानने चंदू आमच्याकडे नाही, चौकशी सुरु आहे असे सांगत झुलवित ठेवले. मात्र विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालयामार्फत आम्ही आंतरराष्ट्रीयस्तरावर दबाव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी संवेदनशील होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान डीजीएमओ कडून सकारात्मक प्रतिसाद            मिळाला. शनिवारी दुपारी 3 वाजता पाकिस्तानने चंदू चव्हाण याला वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.पाकिस्तान मधून परत आल्यानंतर चंदू याच्या लष्कराच्या नियमानुसार वैद्यकीय तपासणीसह काही औपचारिक चौकशी पूर्ण होईल. त्यानंतर काही दिवसात तो कुटुंबियांना भेटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवान व खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव महानगर भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा भाजपा कार्यालयात पदवीधर मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील यांची प्रचार सभा व जिल्हा पदाधिका:यांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, सुभाष शौचे, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.  चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविल्याबद्दल जळगाव महानगर भाजपातर्फे अभिनंदनाचा ठराव माजी             नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.  भाजपाने केंद्रात व राज्यात बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. मात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी कायदे            होतात त्या विधान परिषदेत अजूनही आपण अल्पमतात आहोत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघामधील भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी          ही प्रत्येक कार्यकत्र्यावर असल्याचे भामरे यांनी           सांगितले.