शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कुलगुरुंचे प्राध्यापकांना पत्र; निकालाची कमी टक्केवारी, कॉपी केस अन् विद्यार्थ्यांची गैरहजेरी चिंताजनक..!

By अमित महाबळ | Updated: July 14, 2023 19:35 IST

विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत.

अमित महाबळ, जळगाव:  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले असले तरी निकालाची कमी असलेली टक्केवारी, कॉपीचे वाढलेले प्रमाण आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची गैरहजेरी, याबद्दल कुलगुरुंनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राध्यापकांना लिहिलेल्या पत्रातून चिंता व्यक्त केली आहे.

विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत. यानंतर कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्राध्यापकांना पत्राव्दारे उत्तरपत्रिका मूल्यमापनाच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहभाग घेतल्यामुळे निकाल वेळेवर जाहीर करता आले, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र, निकालाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. शिवाय कॉपीचे प्रमाण वाढले आहे. या चिंताजनक बाबी आहेत. निकालाची टक्केवारी समाधानकारक असावी याकरिता महाविद्यालय स्तरावर विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी वाढेल, अध्ययन प्रक्रियेतील त्यांचा सहभाग अधिक कृतिशील कसा होईल, त्यासाठी आपले अभ्यासक्रमांचे स्वरूप रोजगाराभिमुख कसे करता येईल याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पारंपरिक साच्यात अडकू नका...

युवा पिढीचा कल लक्षात घेऊन शिक्षणाच्या पारंपरिक साच्यात न अडकता नव्या आव्हानांना कुशलतेने आणि व्यावहारिकतेने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल, असे म्हटले आहे. खान्देशाच्या खेड्यापाड्यातील उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या युवा पिढीच्या भवितव्याला आकार देण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात आपण सगळे नवीन ऊर्जा घेऊन सज्ज होऊयात, असा आशावाद कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षण