शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

‘राष्टÑवादी’तील गटबाजी दूर करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:32 IST

शरद पवार रविवारी जळगाव जिल्ह्यात

ठळक मुद्देपक्षाची स्थिती बिकटमनपाच्या निवडणुकीत राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही

विकास पाटीलजळगाव : जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसमधील गटबाजी दूर करुन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचे मोठे आव्हान राष्टÑवादीपुढे आहे.पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते काय ‘मात्रा’ देतात याकडे लक्ष लागून आहे.जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसची स्थिती दयनिय आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणुकीत राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही. २०१३ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मात्र पक्षाला खाते उघडता आले नाही. भाजपाने मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे विद्यमान नगरसेवक आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली. हे नगरसेवक आपल्याकडे यावेत यासाठी दोन महिन्यांपासून भाजपाकडून प्रयत्न सुरु असताना पक्षाचे नेते हातावर हात ठेवून होते, त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.एवढेच नव्हे तर जळगावचे महानगराध्यक्षही मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अशा स्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक होते. मात्र जिल्ह्यातील नेतेच काय तर राज्यातील दोन-तीन नेते सोडले तर कुणीही जळगावात फिरकले नाही. जिल्ह्याचे प्रभारी असलेले दिलीप वळसे पाटील यांनी एकही जाहीर सभा घेतली नाही. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक व जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांच्या सभा झाल्या. इतर स्टार प्रचारक फिरकलेच नाही. माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर तसेच गफ्फार मलिक यांनी खिंड लढविली.जिल्ह्यातील इतरही नेते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिले मात्र उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरताना दिसले नाही. मेहनत घेतली असती तर मनपात कदाचित चित्र वेगळे दिसले असते.पक्षात गटबाजी आहे. राज्यस्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकांनाच फक्त नेते पक्षाच्या कार्यालयात एका व्यासपीठावर येतात. बैठका झाल्यानंतर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अथवा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकत्र येताना दिसत नाही.लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा स्थितीत ही गटबाजी पक्षाला परवडणारी नाही.भाजपा व शिवसेना हे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असताना पक्षाचा अजून उमेदवारही निश्चित नाही. दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची की नाही? याबाबतही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.विरोधी पक्ष असताना विरोधकाची भूमिका चोखपणे बजावताना पक्ष जिल्ह्यात दिसत नाही. सत्तेत असताना शिवसेना कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन करताना दिसते तर राष्टÑवादी केवळ बघ्याची भूमिका घेते. पक्षाने आक्रमक भूमिका घेत नागरिकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव