शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चाळीसगावला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मातब्बरांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने निवडणुकांसाठी गट व गणांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची आकडेवारी तहसीलकडून मागवली असून, आगामी काळात होणाऱ्या या घमासानासाठी मातब्बरांचा कस लागणार, हे स्पष्ट आहे. २०११च्या लोकसंख्येनुसारच आरक्षणही जाहीर होण्याची शक्यता असल्याने याबाबतही राजकीय क्षेत्रासह गावपातळीवर औत्सुक्य आहे.

जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. जिल्हा परिषदेत ६७ गट, तर पंचायत समित्यांचे १३४ गण आहेत. तालुकानिहाय ग्रामीण भागातील लोकसंख्या प्रमाणित प्रपत्रामध्ये जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे. चाळीसगाव तहसील प्रशासनालादेखील ४ जून रोजी असे पत्र प्राप्त झाले असून, प्रपत्रामध्ये लोकसंख्येची माहिती पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलच्या सुत्रांनी दिली.

चौकट

सर्व पक्षीयांसाठी सामना चुरशीचा

सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच २०१६ला या मिनी मंत्रालयांची रणधुमाळी झाली आहे. साहजिकच सव्वा चार वर्षात राजकारणाच्या पुलाखालून नवनवीन समीकरणांचे बरेच पाणी वाहून गेले आहे. २०२२मध्ये होऊ घातलेले घमासान म्हणूनच सर्वपक्षीयांसाठी चुरशीचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सात गटात राष्ट्रवादी भाजपापेक्षा वरचढ ठरला आहे. सातपैकी चार जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला, तर तीन जागांवर भाजपाचे कमळ उमलेले होते. बहाळ - कळमडू, सायगाव - उंबरखेडे, रांजणगाव - पिंपरखेड, तळेगाव - देवळी हे चार गट राष्ट्रवादीने राखले होते. भाजपाने दहिवद - मेहुणबारे, टाकळी प्र. चा. - करगाव, वाघळी - पातोंडा या गटांमध्ये मुसंडी मारली होती.

- या सात गटांपैकी अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे दोन गट महिलांसाठी राखीव आहेत.

-सर्वसाधारण प्रवर्गाचे तीन, तर नागरिकांचा मागास प्रवर्गचे दोन अशी आरक्षणाची स्थिती आहे.

आरक्षणाबाबत मोठी उत्सुकता

ओबीसींच्या आरक्षणाचे त्रांगडे तसेच असल्याने निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या आरक्षणाबाबतही मोठी उत्सुकता आहे. आरक्षणानंतरच खरी स्थिती स्पष्ट होईल. अर्थात मातब्बरांकडून आतापासूनच ‘सेफ झोन’ची चाचपणी केली जात आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा रणधुमाळीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही रंगीत तालीम ठरणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नव्याने समीकरणे अस्तित्त्वात येतील.

चौकट

पंचायत समितीचा सामना ‘बरोबरीत’

पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच झाली. अर्थात दोघांनाही प्रत्येकी सात अशा समान जागा मिळाल्या. यात शिवसेनेची हजेरी निरंक ठरल्याने आगामी निवडणुकीत सेनेला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

१...कळमडू, सायगाव, उंबरखेड, रांजणगाव, पिंपरखेड, देवळी, तळेगाव या सात गणांमध्ये राष्ट्रवादीने विजयी गुलाल उधळला.

२...भाजपाने बहाळ, पातोंडा, दहिवद, मेहुणबारे, करगाव, टाकळी प्र. चा., वाघळी हे सात गण काबीज केले होते.

३...सामना बरोबरीत सुटला असला तरी, पहिल्या टर्ममध्ये सभापती, उपसभापती निवडीत भाजपाने राष्ट्रवादीला चेकमेट दिला. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राष्ट्रवादीने याची परतफेड करीत पंचायत समितीवर झेंडा रोवला.

४..सर्वसाधारण प्रवर्ग चार, तर अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन अशा आरक्षणानुसार सात महिला सदस्या आहेत.

५...सर्वसाधारण तीन, अनु. जाती आणि जमाती प्रत्येकी एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन असे पुरुष सदस्यांच्या सात जागांचे आरक्षण आहे.

६.जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी वेगवेगळे निकष आहेत.

चौकट

चाळीसगावच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या तीन लाख १७ हजार ३२८ इतकी असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका २०११च्या जनगणनेनुसार होतील. यासाठी तहसील प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे.

एकूण लोकसंख्या (ग्रामीण)

- ३,१७,३२८

अनु. जाती -

३१,४४२ अनु. जमाती -

४२,३३२ ........... पक्षीय बलाबल जि. प. एकूण सात गट राष्ट्रवादी - ४

भाजपा - ३

पंचायत समिती एकूण गण - १४ भाजपा - ७

राष्ट्रवादी - ७

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीसाठी ग्रामीण भागाची लोकसंख्या पाठविण्यासंबंधी गत आठवड्यात जिल्हा स्तरावरून पत्र मिळाले आहे. त्यानुसार प्रपत्रामध्ये लोकसंख्येविषयी माहिती पाठवली आहे.

-अमोल मोरे,

तहसीलदार, चाळीसगाव.