शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांचे आजपासून साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी हालचाली सुरु केल्या असताना, दुसरीकडे गाळेधारक देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी हालचाली सुरु केल्या असताना, दुसरीकडे गाळेधारक देखील आक्रमक झाले आहेत. मुदत संपलेल्या मार्केटमधील अव्यावसायीक समजल्या जाणाऱ्या १६ मार्केटच्या गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी ९ ते ५ यावेळेत पाच जणांच्या गटाकडून या साखळी उपोषणात सहभाग घेतला जाणार आहे.

महापालिका व गाळेधारक हा संघर्ष गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला महासभेत बहूमताने मंजूरी मिळाल्यानंतर मनपाकडून आता थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेवून ते लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, हा निर्णय व ठराव गाळेधारकांना मान्य नसून, त्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी गाळेधारकांनी सुरु केली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. साखळी उपोषणात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ हे तर दुसऱ्या टप्प्यात संजय पाटील, पंकज मोमया, वसीम काझी, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आंदोलनाला सुरूवात होणार आहे. परवानगी नुसार दररोज वेगवेगळ्या मार्केटचे पाच जण साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत.

मनपाकडून तयारी सुरु

एकीकडे गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली असताना, दुसरीकडे मनपा प्रशासनाने देखील आता गाळे कारवाईसाठी आपली प्रक्रिया सुरु केली आहे. मनपा प्रशासनाकडून शहरातील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. थकबाकीदारांची यादी तयार करून, मनपाकडून कारवाई केली जाणार आहे. बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर राहणार असून, आठवड्याभरात मनपाकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.