शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले

By निलेश जोशी | Updated: November 20, 2022 12:32 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही.

जळगाव जामोद:

छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात अवाजवी व वादग्रस्त वक्तव्य करणाºया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्राने तात्काळ परत बोलवावे, अशी मागणी आपण केंद्राकडे करणार आहोत. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपने या प्रश्नी महाराष्ट्राची माफी मागावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी जयराम रमेश, एच.के पाटील, बाळासाहेब थोरात, अतुल लोंढे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. एक प्रकारे वैचारिक सफाई करण्याचा प्रकार भाजपकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे इंग्रजांकडून सावरकर ६० रुपयांची पेन्शन  घेत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त व्यक्तव्य केली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे तोल सुटलेल्या राज्यपालांना केंद्राने त्वरीत माघारी बोलवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचा इतिहास कलुषीत करण्याचे भाजपचे मनसुबे!छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याची घोषणा करणारी भाजप आज शिवाजी महाराजासंदर्भातच सुधांशू त्रिवेदीच्या माध्यमातून अपशब्द वापरत आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच ते आता समुद्रात बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे प्रकरणी भाजपने माफी न मागितल्यास भाजपवाल्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोकठोक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले