शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

केंद्राची योजना, मनपाची कसरत!

By admin | Updated: October 18, 2015 00:51 IST

अमृत योजनेमुळे धुळे महापालिकेची चांगलीच कसरत होणार आहे. अर्थसकल्पात 25 टक्के रकमेची तरतूद करावी लागणार आहे.

धुळे : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेची अंमलबजावणी राज्यातील 43 शहरांमध्ये होणार असून त्यात धुळे शहराचा समावेश 23 व्या स्थानी आह़े सदर योजनेसाठी मनपाने नुकताच 380 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला असला तरी त्यापैकी 25 टक्के तरतूद मनपाला करावी लागणार आह़े त्यामुळे केंद्राची योजना राबविताना मनपाला चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसत़े

महापालिकेला अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, मलप्रक्रिया, पजर्न्य जलवाहिनी, नागरी वाहतूक, हरित क्षेत्र विकास व सुधारणा व्यवस्थापन ही कामे मार्गी लावावी लागणार आहेत़ मात्र मनपाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने या योजनेसाठी 25 टक्के निधी उभारणे मनपासाठी अशक्य असल्याचे दिसत़े आधीच 106 कोटी रुपयांच्या योजना मनपा हिस्सा न टाकला गेल्याने प्रलंबित आहेत़ मात्र अमृत योजनेची परिस्थितीही तशीच होऊ नये यासाठी मनपाला हा निधी उभारावाच लागणार आह़े

असा आहे प्रस्ताव

अमृत योजनेंतर्गत महापालिकेने पुढील पाच वर्षात प्राधान्याने करावयाच्या कामांचा अभ्यास करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली 682 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आह़े हा प्रस्ताव मजीप्राच्या माध्यमातून प्रथम राज्य शासनाला व त्यानंतर केंद्र शासनाच्या समितीला सादर करण्यात आला होता़ मात्र केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली असून त्यात भुयारी गटारी योजनेसाठी 238 कोटी व अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रार्पयत जलवाहिनी टाकणे व हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 25 एमएलडीने वाढविणे या कामांसाठी 142 कोटी रुपये, अशा कामांचा समावेश आह़े

मार्गदर्शक सूचना

अमृत अभियानांतर्गत करावयाच्या कामांसाठी केंद्र शासनाने स्वीकारलेल्या 380 कोटी रुपयांच्या प्रस्तावातील 25 टक्के, अर्थात 95 कोटी रुपये मनपाला उभारावे लागणार आहेत़ तर दुसरीकडे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व शौचालयांचे कामही हाती घेण्यात येत असून त्यातही मनपाला हिस्सा टाकावा लागणार आह़े आधीच 106 कोटी थकीत असताना सध्या येत असलेल्या योजना राबविण्यासाठी मनपाला आजच्या स्थितीत किमान 150 कोटी रुपयांची गरज असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आल़े

मजीप्राला तीन टक्के शुल्क

‘अमृत’ अभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्यात आले आह़े त्यासाठी मजीप्रास तीन टक्के प्रकल्प व्यवस्थापन शुल्क मनपाला द्यावा लागणार आह़े

कजर्ही मिळणार नाही

अमृतसह स्वच्छ भारत अभियानासाठी निधी उभारणे मनपाला शक्य नसल्याने राज्य शासनाकडूनच या योजनांसाठी कर्ज घेण्याच्या विचारात मनपा प्रशासन होत़े मात्र आधीच असलेले तापी पाणीपुरवठा योजनेचे 166 कोटींचे कर्ज माफ करताना दमछाक होत आह़े त्यामुळे कजर्ही मिळू शकणार नाही़ परिणामी काटकसर करूनच निधी उभारावा लागणार आह़े मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली, मोबाइल टॉवर्सच्या दंडात वाढ यांसह सर्व करांमध्ये वाढ करूनच निधी उभारावा लागणार आह़े या योजनांमध्ये मनपा हिस्सा टाकला, तर योजना राबविल्या जातील व जनतेला त्यांचा निश्चित फायदा होईल़