शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:45 IST

सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे.

ठळक मुद्देलघू पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा कारभार चव्हाट्यावरप्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका‘जलयुक्त’चा निधी परत

मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले असून, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असल्याने संतप्त भावना शेतकºयांंमध्ये व्यक्त होत आहे.देवळी व गोगडी नदीवर धरणे असून, सततच्या पावसाने धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे दोन्ही नद्यांचा संगम असल्याने याचे प्रवाहित पाणी गोगडी नदीच्या पात्रात येते. सांगवी गावाच्या पुढे या नदीवर लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तर अंतर्गत सिमेंटचा साठवण बंधारा घातला आहे. पण दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती नाही. पाण्याच्या प्रवाहाला वाट न मिळाल्याने बंधाºयाला भगदाड पडून शेतातून पाणी वाहत आहे. डॉ.जितेंद्र सुधाकर घोंगडे व विजय केशव घोंगडे या शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी सरंपच ज्योती शंकर घोंगडे, माजी सभापती बाबूराव घोंगडे यांची शेती आहे. तरीही बंधाºयाचे काम रखडले आहे.याच नदीवर दुसºया ठिकाणी अशाच पद्धतीने माजी सरपंच देवकाबाई रामकृष्ण बनकर यांच्या शेताजवळील साठवण बंधाºयाला भगदाड पडल्याने शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या लालफितीचा फटका शेतकºयांना बसत असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त १९ जून २०१५ प्रकाशित केले आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका२०१५ मध्ये, नंतर मध्ये एकदा व यावर्षी झालेल्या पावसाने बंधाºयाला भगदाड पडण्याची तिसरी वेळ आहे. या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लघुपाटबंधारे जलसिंचन विभाग कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून दुरूस्तीची मागणी केली आहे, तर यामुळे होणाºया नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाच्या तक्रारी दिल्या आहेत. ‘लोकमत’नेही सत्यता समोर आणली आहे. तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘जलयुक्त’चा निधी परत२०१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी शासनातर्फे जिल्ह्यात आलेल्या २५ कोटी निधीपैकी ११ कोटी ७६ लाख निधी कामांवर खर्च न करता परत गेला आहे.या बंधाºयासंदर्भात लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे तत्कालीन अभियंता विसावे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मंजुरीचे आश्वासन दिले होते. पण बंधारा दुरूस्तीचे काम दुर्लक्षित आहे. स्वखर्चाने येथील शेतकºयांनी याची दुरुस्ती केली आहे. पण या पावसाने पुन्हा बंधाºयाला भगदाड पडले आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.-बाबूराव केशव घोंगडे,माजी सभापती, पंचायत समिती सभापती, जामनेर 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर