शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

सीसीआय सुरु करणार राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 22:12 IST

राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देयंदा ९० लाख गाठी उत्पन्न होण्याचा अंदाज ५० लाख गाठींची होणार निर्यात निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

आॅनलाईन लोकमत, अजय पाटील

जळगाव, दि.१०-राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यभरात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागांमध्ये बागायती कापूससह पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्नन्न होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरातील खासगी जिनींग मालकांनी आपल्या जिनींग मध्ये कापूस खरेदीस सुरुवात केली असून, लवकरच शासकीय कापूस खरेदी केंद्र देखील सुरुवात होणार आहे. सीसीआयकडून राज्यभरात सुरु होत असलेल्या ६४ केंद्रामध्ये ३५ केंद्र औरंगाबाद विभागात तर २९ केंद्र अकोला विभागात सुरु करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी सीसीआयकडून ५८ खरेदी केंद्र सुुरु केले होते.

४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड

गेल्या वर्षी राज्यात ३९ लाख हेक्टरवर जमिनीवर कापूस लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत ३ लाख हेक्टर म्हणजेच ४२ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात देखील वाढणार होणार आहे. गेल्यावर्षी राज्यातुन ७७ लाख गाठींचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा ९० लाख गाठींचे उत्पन्न हेण्याचा अंदाज आहे. सीसीआय प्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडून देखील यंदा राज्यात ६० खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.

निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

शासनाने जरी ४ हजार ३२० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. तर खासगी जिनींगमध्ये सध्या ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी होत आहे. यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्टÑीय बाजारावर कापसाचे दर निश्चित होणार आहेत. भारताकडून बांग्लादेश, चीन व दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात होते. गेल्या वर्षी महाराष्टÑातुन ४५ लाख गाठींची निर्यात झाली होती. यंदा ५० लाख गाठींची निर्यात विदेशात होण्याची शक्यता आहे. तसेच चीन, इंडोनेशिया मध्ये कापसाची मागणी वाढल्यास दर देखील वाढू शकतात. मात्र डिसेंबर पर्यंत तरी कापसाचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज कापूस उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.