शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

सीसीआय सुरु करणार राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 22:12 IST

राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देयंदा ९० लाख गाठी उत्पन्न होण्याचा अंदाज ५० लाख गाठींची होणार निर्यात निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

आॅनलाईन लोकमत, अजय पाटील

जळगाव, दि.१०-राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यभरात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागांमध्ये बागायती कापूससह पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्नन्न होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरातील खासगी जिनींग मालकांनी आपल्या जिनींग मध्ये कापूस खरेदीस सुरुवात केली असून, लवकरच शासकीय कापूस खरेदी केंद्र देखील सुरुवात होणार आहे. सीसीआयकडून राज्यभरात सुरु होत असलेल्या ६४ केंद्रामध्ये ३५ केंद्र औरंगाबाद विभागात तर २९ केंद्र अकोला विभागात सुरु करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी सीसीआयकडून ५८ खरेदी केंद्र सुुरु केले होते.

४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड

गेल्या वर्षी राज्यात ३९ लाख हेक्टरवर जमिनीवर कापूस लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत ३ लाख हेक्टर म्हणजेच ४२ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात देखील वाढणार होणार आहे. गेल्यावर्षी राज्यातुन ७७ लाख गाठींचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा ९० लाख गाठींचे उत्पन्न हेण्याचा अंदाज आहे. सीसीआय प्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडून देखील यंदा राज्यात ६० खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.

निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

शासनाने जरी ४ हजार ३२० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. तर खासगी जिनींगमध्ये सध्या ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी होत आहे. यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्टÑीय बाजारावर कापसाचे दर निश्चित होणार आहेत. भारताकडून बांग्लादेश, चीन व दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात होते. गेल्या वर्षी महाराष्टÑातुन ४५ लाख गाठींची निर्यात झाली होती. यंदा ५० लाख गाठींची निर्यात विदेशात होण्याची शक्यता आहे. तसेच चीन, इंडोनेशिया मध्ये कापसाची मागणी वाढल्यास दर देखील वाढू शकतात. मात्र डिसेंबर पर्यंत तरी कापसाचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज कापूस उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.