शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

सीसीआय सुरु करणार राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 22:12 IST

राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देयंदा ९० लाख गाठी उत्पन्न होण्याचा अंदाज ५० लाख गाठींची होणार निर्यात निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

आॅनलाईन लोकमत, अजय पाटील

जळगाव, दि.१०-राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी शासकीय खरेदीला आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) कडून राज्यात ६४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सीसीआयचे खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक अतुल काला यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यभरात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ व खान्देश या भागांमध्ये बागायती कापूससह पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्नन्न होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरातील खासगी जिनींग मालकांनी आपल्या जिनींग मध्ये कापूस खरेदीस सुरुवात केली असून, लवकरच शासकीय कापूस खरेदी केंद्र देखील सुरुवात होणार आहे. सीसीआयकडून राज्यभरात सुरु होत असलेल्या ६४ केंद्रामध्ये ३५ केंद्र औरंगाबाद विभागात तर २९ केंद्र अकोला विभागात सुरु करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी सीसीआयकडून ५८ खरेदी केंद्र सुुरु केले होते.

४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड

गेल्या वर्षी राज्यात ३९ लाख हेक्टरवर जमिनीवर कापूस लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षाच्या तुलनेत ३ लाख हेक्टर म्हणजेच ४२ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात देखील वाढणार होणार आहे. गेल्यावर्षी राज्यातुन ७७ लाख गाठींचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा ९० लाख गाठींचे उत्पन्न हेण्याचा अंदाज आहे. सीसीआय प्रमाणेच महाराष्टÑ कापूस फेडरेशनकडून देखील यंदा राज्यात ६० खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.

निर्यात वाढल्यास दरावर होणार परिणाम

शासनाने जरी ४ हजार ३२० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. तर खासगी जिनींगमध्ये सध्या ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी होत आहे. यंदा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्टÑीय बाजारावर कापसाचे दर निश्चित होणार आहेत. भारताकडून बांग्लादेश, चीन व दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात होते. गेल्या वर्षी महाराष्टÑातुन ४५ लाख गाठींची निर्यात झाली होती. यंदा ५० लाख गाठींची निर्यात विदेशात होण्याची शक्यता आहे. तसेच चीन, इंडोनेशिया मध्ये कापसाची मागणी वाढल्यास दर देखील वाढू शकतात. मात्र डिसेंबर पर्यंत तरी कापसाचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज कापूस उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.