शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफी योजनेला भारनियमनाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 12:43 IST

प्रक्रियेत खोडा : अर्ज दाखल करण्यास मिळाली मुदतवाढ, अडथळे दूर होण्याची अपेक्षा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्ज माफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.  14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात  दोन लाख 43 हजार (वैयक्तिक चार लाखाच्यावर) शेतक:यांचे अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी भारनियमनामुळे अडचणी येत असल्याने दररोजची सरासरी 10 ते 20 टक्क्यांवर आली आहे.  या योजनेचे अर्ज नोंदणीस 24 जुलै पासून सुरुवात झाली. यामध्ये 14 सप्टेंबर्पयत कुटुंब व्याख्येनुसार जळगाव जिल्ह्यात  दोन लाख 43 हजार शेतक:यांचे अर्ज भरल्या गेले आहेत. 15 सप्टेंबर अखेरचा दिवस असल्याने त्यासाठी लगबगदेखील सुरू होती. मात्र यासाठी मुदतवाढीची घोषणा रात्री झाल्याने दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या अंमबलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली 13 रोजी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीदेखील स्थापन करण्यात आली असून सोबतच तालुकास्तरावर उपविभागीय अधिका:यांच्या अध्यक्षतेखाली समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कजर्दार शेतकरी सभासदांनी तसेच विकास संस्था व सर्व बँकांनी अर्ज भरावेत असे आवाहन,  जिल्हा उपनिबंधक विजय जाधवर यांनी केले आहे. भारनियमनाचा खोडाऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात महा ऑनलाईन, सी.एस.सी. एस.पी.व्ही., आपले सरकार वेब पोर्टलची अशा केंद्रांद्वारे अर्ज भरले जाऊ लागले. यात  सव्र्हर हँग होणे, वेबसाईट ओपन न होणे आदी अडचणी येत होत्या. यासाठी जळगाव जिल्ह्यात  ऑफलाईन अर्ज जमा करून ते रात्री किंवा इतर वेळी वेबसाईट सुरळीत सुरू असताना ऑनलाईन भरण्याचा धडाका सुरू झाला. मात्र यात आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे खोडा येत आहे. संख्या आली 10 ते 20 टक्क्यांवरदररोज 10 हजार अर्ज भरल्या जाऊ लागल्यानंतर आता भारनियमनाच्या अडथळ्य़ामुळे ही संख्या एकदम एक ते दोन हजारांवर आली आहे. त्यामुळे शेतक:यांचे अर्ज आले तरी ते अपलोड करण्यात अडचणी येत आहे. मुदत वाढ मिळाली, भारनियमनाचे काय?भारनियमनामुळे अर्ज अपलोड करण्यात अडचणी येत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, याबाबत राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांसह जळगावचे जिल्हा उप निबंधक विशाल जाधवर यांनीही वरिष्ठांना कळविले होते. आता मुदतवाढ तर मिळाली आहे, मात्र भारनियमनाचा अडथळाही दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सव्र्हर डाऊन, तांत्रिक अडचणीसोबतच आता भारनियमनामुळे कजर्माफीचे अर्ज अपलोड करण्यास अडचणी येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून भारनियमनामुळे ही संख्या एकदमच कमी झाली आहे. मुदतवाढी विषयी वरिष्ठांकडे कळविले होते. -विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक