शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

झोऱ्यावरची एरंडोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. ...

एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. तो निर्णय सगळ्या नगराला मान्य असायचा. एक चक्र पद्धतीने निर्णयाची अंमलबजावणी व्हायची. थोडक्यात आज एखाद्या विवादात झालेला निर्णय चक्रीय पद्धतीने इतर विवादावर लागू असायचा. ज्याला आजच्या न्यायालयीन भाषेत सायटेशन अर्थात न्याय संदर्भ असे म्हणतो. यावरून त्या गावाचे नाव एकचक्र नगरी पडले असावे. त्या नगराच्या नावाने अनेक वाद मिटवले जात असत त्या नगराची ही कहाणी.

एरंडोली हा शब्द खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी भाषिकाच्या तोंडी खूपदा ऐकला जातो. काय असावा या शब्दाचा अर्थ. तसाच " टाका झोऱ्या किंवा झोऱ्यावर बसून घ्या " याचा वाक्यांश हा एरंडोली या शब्दांशी संबंधित आहे का ? यांचा एकमेकांशी काय संबंध ? यांचा शोध घेतला असता असा बोध होता की " झोऱ्या टाका, किंवा झोऱ्यावर बसून घ्या " म्हणजे सौद्यासाठी एकत्र बसून चर्चा करून घ्या असा सर्वसाधारणपणे होतो. मग झोऱ्याच का ? एरंडोल जवळ एक गाव आहे कासोदा. या गावात पूर्वी हातमागावर झोरे विणले जायचे. हे झोरे इतके मजबूत होते की या झोऱ्याची पारख त्या झोऱ्याला चारही बाजूंनी वर धरून त्यांत तांब्याभर पाणी ओतलं जायचं. हे पाणी खाली टपकलं नाही तर हा झोऱ्या मजबूत. मग या झोऱ्यावर बसून जे जे सौदे होत त्यात बहुतांशी ओढाताणी अधिक होत होती. ऊठबस व्हायची. मग ही सौद्यासाठी होणारी ओढाताण, उठबस बंद करून चार चौघांसमक्ष तडजोडीचा मार्ग स्वीकारला जायचा. या झोऱ्यावर बसून झालेला व्यवहार हा त्या झोऱ्यासारखा मजबूत. कोठेही न गळणारा. व्यवहारात एकाने एक पाऊल पुढे यावे आणि दुसऱ्याने एक पाऊल मागे जावे या सगळ्या प्रक्रियेत हा व्यवहार घडवणे ही एक भावना. ही जी तडजोड आहे तिला एरंडोली असं म्हणतात.

एरंडोली या शब्दाला काही भागात मांडवली असा शब्दप्रयोग असला ही तडजोडीची पद्धत एरंडोलमध्ये पौराणिक काळापासून चालत आलेली आहे. पांडवांचं काही काळ वास्तव्य एरंडोल, तत्कालीन नाव एक चक्रनगरी येथे होतं तेव्हा बकासूर नावाचा एक राक्षस रोज गावात येऊन धुमाकूळ घालत असे. तेव्हा त्या राक्षसाशी बोलणी करून त्याला लागणारं अन्न रोज एका घरून क्रमाक्रमाने दिलं जाईल, अशी तडजोड झाली. ती पुढे गावाचे नाव बदलाबरोबर एरंडोली या नावाने प्रसिद्ध झालेली आहे.

ही एरंडोली अर्थात तडजोड आज शासन दरबारात पोहोचली आणि त्यांचं गोंडस नामकरण झालं, लोक अदालत. लोक अदालतीत अनेक प्रकरणं असे तडजोडीने मिटवले जातात . तत्कालीन परिस्थितीत एरंडोली झोऱ्यावर व्हायची. आता त्याला कायद्याची वैध चौकट लाभली. कायद्याच्या कक्षेत तडजोडीने प्रकरणांचा निपटारा वेगाने होऊ लागला. विशेष म्हणजे यात दोघं पक्ष समाधानी. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांना विश्वास अधिक दृढ झाला. वृद्धिंगत झाला.

या सगळ्या राष्ट्रीय कामात एरंडोली या शब्दाचे योगदान ठळकपणे प्रतिबिंबित होते. एरंडोली पद्धतीने आपण आसपासची प्रकरणं सोडवण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक प्रदूषण दूर करण्यात आपला हातभार नक्कीच लागेल. सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण निकोप आणि सदृढ होईल.

ही आटपाट नगराची कहाणी सुफळ संपूर्ण.