शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

झोऱ्यावरची एरंडोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. ...

एक आटपाट नगर होतं. त्या नगराला राजा नव्हता. तेथे लोकं एकत्र येऊन पारदर्शीपणे एखाद्या समस्येवर, वाद विवादावर निर्णय घ्यायचे. तो निर्णय सगळ्या नगराला मान्य असायचा. एक चक्र पद्धतीने निर्णयाची अंमलबजावणी व्हायची. थोडक्यात आज एखाद्या विवादात झालेला निर्णय चक्रीय पद्धतीने इतर विवादावर लागू असायचा. ज्याला आजच्या न्यायालयीन भाषेत सायटेशन अर्थात न्याय संदर्भ असे म्हणतो. यावरून त्या गावाचे नाव एकचक्र नगरी पडले असावे. त्या नगराच्या नावाने अनेक वाद मिटवले जात असत त्या नगराची ही कहाणी.

एरंडोली हा शब्द खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी भाषिकाच्या तोंडी खूपदा ऐकला जातो. काय असावा या शब्दाचा अर्थ. तसाच " टाका झोऱ्या किंवा झोऱ्यावर बसून घ्या " याचा वाक्यांश हा एरंडोली या शब्दांशी संबंधित आहे का ? यांचा एकमेकांशी काय संबंध ? यांचा शोध घेतला असता असा बोध होता की " झोऱ्या टाका, किंवा झोऱ्यावर बसून घ्या " म्हणजे सौद्यासाठी एकत्र बसून चर्चा करून घ्या असा सर्वसाधारणपणे होतो. मग झोऱ्याच का ? एरंडोल जवळ एक गाव आहे कासोदा. या गावात पूर्वी हातमागावर झोरे विणले जायचे. हे झोरे इतके मजबूत होते की या झोऱ्याची पारख त्या झोऱ्याला चारही बाजूंनी वर धरून त्यांत तांब्याभर पाणी ओतलं जायचं. हे पाणी खाली टपकलं नाही तर हा झोऱ्या मजबूत. मग या झोऱ्यावर बसून जे जे सौदे होत त्यात बहुतांशी ओढाताणी अधिक होत होती. ऊठबस व्हायची. मग ही सौद्यासाठी होणारी ओढाताण, उठबस बंद करून चार चौघांसमक्ष तडजोडीचा मार्ग स्वीकारला जायचा. या झोऱ्यावर बसून झालेला व्यवहार हा त्या झोऱ्यासारखा मजबूत. कोठेही न गळणारा. व्यवहारात एकाने एक पाऊल पुढे यावे आणि दुसऱ्याने एक पाऊल मागे जावे या सगळ्या प्रक्रियेत हा व्यवहार घडवणे ही एक भावना. ही जी तडजोड आहे तिला एरंडोली असं म्हणतात.

एरंडोली या शब्दाला काही भागात मांडवली असा शब्दप्रयोग असला ही तडजोडीची पद्धत एरंडोलमध्ये पौराणिक काळापासून चालत आलेली आहे. पांडवांचं काही काळ वास्तव्य एरंडोल, तत्कालीन नाव एक चक्रनगरी येथे होतं तेव्हा बकासूर नावाचा एक राक्षस रोज गावात येऊन धुमाकूळ घालत असे. तेव्हा त्या राक्षसाशी बोलणी करून त्याला लागणारं अन्न रोज एका घरून क्रमाक्रमाने दिलं जाईल, अशी तडजोड झाली. ती पुढे गावाचे नाव बदलाबरोबर एरंडोली या नावाने प्रसिद्ध झालेली आहे.

ही एरंडोली अर्थात तडजोड आज शासन दरबारात पोहोचली आणि त्यांचं गोंडस नामकरण झालं, लोक अदालत. लोक अदालतीत अनेक प्रकरणं असे तडजोडीने मिटवले जातात . तत्कालीन परिस्थितीत एरंडोली झोऱ्यावर व्हायची. आता त्याला कायद्याची वैध चौकट लाभली. कायद्याच्या कक्षेत तडजोडीने प्रकरणांचा निपटारा वेगाने होऊ लागला. विशेष म्हणजे यात दोघं पक्ष समाधानी. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांना विश्वास अधिक दृढ झाला. वृद्धिंगत झाला.

या सगळ्या राष्ट्रीय कामात एरंडोली या शब्दाचे योगदान ठळकपणे प्रतिबिंबित होते. एरंडोली पद्धतीने आपण आसपासची प्रकरणं सोडवण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक प्रदूषण दूर करण्यात आपला हातभार नक्कीच लागेल. सामाजिक, आर्थिक, राजकीय वातावरण निकोप आणि सदृढ होईल.

ही आटपाट नगराची कहाणी सुफळ संपूर्ण.