शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

घर खरेदीसाठी जमवलेली तीन लाखांची रोकड खाक

By admin | Updated: April 18, 2017 00:33 IST

रिंगणगाव येथे घरास आग : शेतक:यावर आपत्ती, कुटुंब उघडय़ावर, तरुणांनी जीव धोक्यात घालून विझवली आग

रिंगणगाव, ता.एरंडोल : येथे एका शेतक:याच्या घरास अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्यासोबत घर खरेदीसाठी जमविलेले 2 लाख 75 हजार व  कापूस विक्रीतून आलेले 30 हजार असे एकूण 3 लाख रु. जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आणि आग आटोक्यात आणली.रिंगणगाव येथील बाबूलाल हिरामण बाविस्कर यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ते शेती करून आपला चरितार्थ चालवितात. शेतीचे उत्पन्न आणि वडिलांकडून घर खरेदीसाठी उसने घेतलेले पावणेतीन लाख रु. व संसारोपयोगी साहित्य यांची या आगीत जळून राखरांगोळी झाली आहे. हा परिवार पूर्णपणे उघडय़ावर आला आहे.बाविस्कर हे कोळीवाडय़ात आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्याचे दिवस  असल्याने आज सकाळी ते   लवकर शेतात निघून गेले. मात्र त्यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट निघू लागल्याने आणि घरात आग लागल्याचे दिसल्याने शेजारी राहणा:या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मिळेल त्या साधनाने आणि मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, गावात लगAकार्य असल्यामुळे तिथे उभा असलेला पाण्याचा टँकर लगेच तरुणांनी घटनास्थळी आणला व पाणी मारण्यास सुरुवात केली. घटनेचे वृत्त कळताच तलाठी पानपाटील यांनी अगिAशमन दलास कळविले आणि अवघ्या 20 मिनिटात एरंडोल, जळगावचे अगिAशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. घरास आग लागल्याचे समजताच बाविस्कर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. तोर्पयत तरुणांनी धाब्यावर चढून टीकाव, पावडय़ाने माती टाकण्याचे काम सुरू केले होते. अगिAशमन बंब गावात आला पण विजेच्या तारा ह्या गल्लीत खूप खाली असल्याने वीज प्रवाह उतरण्याचा धोका होता. त्यामुळे  वीज प्रवाह  उपकेंद्रावरून लगेच बंद करण्यात आला आणि अगिAशमन दलाच्या जवानाने निमुळत्या गल्लीतून गाडी पास करून घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. जैन इरिगेशन कंपनीचा दुसरा अगिAशमन बंबदेखील गावात दाखल झाला होता. मात्र तोर्पयत आग आटोक्यात आणली गेली.आगीचे वृत्त समजताच सर्व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपापल्या परिने आग विझविण्याचे प्रयत्न केले. या वेळी बाबूलाल बाविस्कर यांनी घरातून पैशांचा डबा काढून आणला. मात्र त्यात ठेवलेल्या 500, 100, 2000 रु. च्या नोटा जळून खाक झाल्या होत्या. तर काही अर्धवट जळालेल्या  होत्या. हे पाहून बाविस्कर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या वेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी नायब तहसीलदार आबा महाजन, वरिष्ठ लिपिक  हरणे, तलाठी पानपाटील, पोलीस पाटील वासुदेव मोरे, ग्रामसेवक सतीश सूर्यवंशी व ग्रा.पं. पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीत विष्णू विश्राम बाविस्कर व बापू बाविस्कर यांचीही घरे जळून नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा करण्यात आला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला                 आहे.                                                जीव धोक्यात घालून काढली गॅस हंडी घरातून धुराचे लोट निघत असल्याचे समजताच दरवाजा तोडण्यात आला. मात्र घरात धुराच्या साम्राज्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून गॅस हंडी उचलून अंगणात आणली व त्यावर पाण्याचा मारा सुरू केला. या  गॅस हंडीने पेट घेतला असता तर  स्फोट होऊन अनर्थ होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने ते टळले.