शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

घर खरेदीसाठी जमवलेली तीन लाखांची रोकड खाक

By admin | Updated: April 18, 2017 00:33 IST

रिंगणगाव येथे घरास आग : शेतक:यावर आपत्ती, कुटुंब उघडय़ावर, तरुणांनी जीव धोक्यात घालून विझवली आग

रिंगणगाव, ता.एरंडोल : येथे एका शेतक:याच्या घरास अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्यासोबत घर खरेदीसाठी जमविलेले 2 लाख 75 हजार व  कापूस विक्रीतून आलेले 30 हजार असे एकूण 3 लाख रु. जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आणि आग आटोक्यात आणली.रिंगणगाव येथील बाबूलाल हिरामण बाविस्कर यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ते शेती करून आपला चरितार्थ चालवितात. शेतीचे उत्पन्न आणि वडिलांकडून घर खरेदीसाठी उसने घेतलेले पावणेतीन लाख रु. व संसारोपयोगी साहित्य यांची या आगीत जळून राखरांगोळी झाली आहे. हा परिवार पूर्णपणे उघडय़ावर आला आहे.बाविस्कर हे कोळीवाडय़ात आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्याचे दिवस  असल्याने आज सकाळी ते   लवकर शेतात निघून गेले. मात्र त्यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट निघू लागल्याने आणि घरात आग लागल्याचे दिसल्याने शेजारी राहणा:या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मिळेल त्या साधनाने आणि मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, गावात लगAकार्य असल्यामुळे तिथे उभा असलेला पाण्याचा टँकर लगेच तरुणांनी घटनास्थळी आणला व पाणी मारण्यास सुरुवात केली. घटनेचे वृत्त कळताच तलाठी पानपाटील यांनी अगिAशमन दलास कळविले आणि अवघ्या 20 मिनिटात एरंडोल, जळगावचे अगिAशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. घरास आग लागल्याचे समजताच बाविस्कर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. तोर्पयत तरुणांनी धाब्यावर चढून टीकाव, पावडय़ाने माती टाकण्याचे काम सुरू केले होते. अगिAशमन बंब गावात आला पण विजेच्या तारा ह्या गल्लीत खूप खाली असल्याने वीज प्रवाह उतरण्याचा धोका होता. त्यामुळे  वीज प्रवाह  उपकेंद्रावरून लगेच बंद करण्यात आला आणि अगिAशमन दलाच्या जवानाने निमुळत्या गल्लीतून गाडी पास करून घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. जैन इरिगेशन कंपनीचा दुसरा अगिAशमन बंबदेखील गावात दाखल झाला होता. मात्र तोर्पयत आग आटोक्यात आणली गेली.आगीचे वृत्त समजताच सर्व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपापल्या परिने आग विझविण्याचे प्रयत्न केले. या वेळी बाबूलाल बाविस्कर यांनी घरातून पैशांचा डबा काढून आणला. मात्र त्यात ठेवलेल्या 500, 100, 2000 रु. च्या नोटा जळून खाक झाल्या होत्या. तर काही अर्धवट जळालेल्या  होत्या. हे पाहून बाविस्कर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या वेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी नायब तहसीलदार आबा महाजन, वरिष्ठ लिपिक  हरणे, तलाठी पानपाटील, पोलीस पाटील वासुदेव मोरे, ग्रामसेवक सतीश सूर्यवंशी व ग्रा.पं. पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीत विष्णू विश्राम बाविस्कर व बापू बाविस्कर यांचीही घरे जळून नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा करण्यात आला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला                 आहे.                                                जीव धोक्यात घालून काढली गॅस हंडी घरातून धुराचे लोट निघत असल्याचे समजताच दरवाजा तोडण्यात आला. मात्र घरात धुराच्या साम्राज्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून गॅस हंडी उचलून अंगणात आणली व त्यावर पाण्याचा मारा सुरू केला. या  गॅस हंडीने पेट घेतला असता तर  स्फोट होऊन अनर्थ होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने ते टळले.