शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कार्बाईडचे आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 16:13 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल मध्ये ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात अॅड. सुशील अत्रे यांनी लिहिलेला लेख.

 परवा फेसबुकवरती एक पोस्ट वाचण्यात आली. उन्हाळ्याच्या सुटीत  वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा छंदवर्गामध्ये पोरांना घेऊन जाणा:या पालकांकडे बघून म्हणे ‘कार्बाईड टाकून हिरवे आंबे घाईने वेळेआधी पिकवणा:या व्यापा:यांची आठवण येते! ‘फेसबुकादपि सुभाषितम् ग्राह्यम्’.. ही आंब्यांची उपमा मुलांना देण्याची मूळ कल्पना कुणाची, हे माहिती नाही, पण त्याला मानलं पाहिजे. अगदी चपखल उपमा आहे. आणि त्याहून योग्य उपमा आहे, ‘व्यापा:यांची’. हे व्यापारी म्हणजे पालक की क्लासचालक की दोघेही, हे ज्याने-त्याने मनाशी ठरवावं. व्यापा:याला आंबा गोड आहे की, आंबट आहे; की बेचव आहे, याच्याशी काहीही कर्तव्य नसतं. त्याला तो खायचा नसतोच- फक्त ‘खपवायचा’ असतो. म्हणूनच कार्बाईड पावडर टाकून त्याचा रंग केशरी झाला की, तो पिकल्यासारखा दिसतो. एवढंच व्यापा:याला पुरेसं असतं. कारण मग गि:हाईकांच्या संतोषासाठी टोपलीत लाल कागदावरती रचावे, तसेच हे वरवर पिकलेले आंबे, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर रचता येतात. छान, संपूर्ण पान भरून ‘पासपोर्ट साईज’चे आंबे ओळीत रचलेले असतात-

‘‘या हो, या.. सा:यांनी या, बघा, बघा आमचे आंबे बघा. कितीही कच्चे पाठवा- पिकवण्याची आमची ग्यारंटी. प्रत्येक आंबा निदान नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकणारच! हे बघा इथे मांडलेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेले, मागच्या अढीतले छान-छान आंबे.. आम्हाला विसरू नका.. आंबे पिकवण्यात आम्हीच नंबर वन!’’
ते पेपरमधले आंबे पाहिले, की कसे सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात. प्रत्येकालाच इच्छा असते, की माङया झाडावरचा आंबा आधी पिकला पाहिजे. कुठेतरी पटतंय हो, की हे असं पावडर टाकून पिकवणं आंब्यासाठी चांगलं नाही, पण काय करणार? घरच्या घरी, कुटुंबाच्या संस्कारांमध्ये पिकवत बसलो, तर त्याला फारच वेळ लागतो. मग तोर्पयत इतरांकडचे आंबे पटापटा पिकून ‘बाजारात’ येतात; आणि आपला आंबा तसाच? कसं चालायचं हे? शेवटी, ‘कॉम्पिटिशन’मध्ये आपला आंबा मागे पडायला नको. हे सगळं आंब्याच्याच भल्यासाठी आहे. बरं, नुसता पिकवून चालत नाही; तर त्याचं वाणही बघावं लागतं! इथे प्रत्येक झाडाला हापूस आंबेच आले पाहिजेत, हा सगळ्यांचा अट्टाहास आहे. तोही र}ागिरी हापूस. यू.एस.एक्स्पोर्ट क्वॉलिटी! शेवटी इतका आटापिटा करून आंबा पिकवायचा कशासाठी? अमेरिकेत पाठवण्यासाठीच ना! मग देवगड हापूस पण चालणार नाही. र}ागिरी म्हणजे र}ागिरीच. (तो म्हणे पिकत असतानाच अमेरिकन गि:हाईकं उचलून घेतात-प्लेसमेंट का काय म्हणतात म्हणे त्याला.) इकडे कमी पिकणा:या आंब्याला ‘लंगडा आंबा’ म्हणायची पद्धत आहे. आपला आंबा ‘लंगडा’ आहे, हे कुणीच कबूल करायला तयार नसतं. त्यांना तो प्रचंड कमीपणा वाटतो. म्हणजे, ‘लंगडा आंबा’ ही एक स्वतंत्र जात आहे. तिला  स्वत:चं असं रंग-रूप आहे. स्वाद आहे. वेगळेपणा आहे.. हे कुणाला मान्यच नाही. तोच कशाला, पण पायरी, केशर, बदाम, तोतापुरी.. कुणाचंच वेगळेपण मान्य नाही. तो ‘हापूस’ नाहीये ना? मग संपलं. त्याच्यात काही अर्थ नाही. आमचं झाड कोणत्याही जातीचं असलं, कलमी असलं- कसंही असलं तरी त्याचा पिकल्यावर हापूसच झाला पाहिजे- नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेला हापूस! मग, टाका भरमसाठ पावडर. ती त्या कोवळ्या आंब्याला ङोपतेय की नाही, याची फिकीर नाही. आंबा सडून गेला? चिंता नाही. उचलून फेका टोपली बाहेर. त्याच्या जागी दुसरा आहेच पिकायला तयार. आंब्याचं नशीब, की त्याला बळजबरीने का होईना, पण ‘पिकवतात’. आपल्या देशात कैरीचं नशीब आंब्यांपेक्षाही वाईट आहे. कैरीला तर पिकण्याची संधी मिळेलच, याचीही खात्री नाही. कधी तिला ‘मोहोर’ असतानाच खुडून टाकतात. तर कधी वाढ होण्याआधीच घाईघाईने झाडावरून उतरवतात. आणि संसाराच्या खारात बुडवून लोणच्याच्या बरणीत कैद करून ठेवून देतात. आपण ‘हापूस’ आहोत, का ‘लंगडा’ आहोत, हे पडताळून बघण्याची तिला संधीच मिळत नाही. त्या आधीच तिच्या फोडी झालेल्या असतात. काही लोणच्याच्या खारात बुडतात, तर काही साखरेच्या पाकात बुडून ‘साखरांबा’ म्हणवतात. बरं, पाक साखरेचा-त्यामुळे तक्रार करायची नाही. गुदमरणं मग दोन्हीकडे सारखंच! आणि मुळात तिला पिकायचं होतं की नाही, हे तिला कोणी विचारतच नाही-
- नाही तरी, ‘‘तुझं आता काय करू?’’ असं कैरीला किंवा आंब्याला कधी कुणी विचारतं कां? ते आपणच ठरवणार. आपल्या झाडाचं फळ- त्यावर हक्क आपलाच! हो की नाही?