शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कार्बाईडचे आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 16:13 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल मध्ये ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात अॅड. सुशील अत्रे यांनी लिहिलेला लेख.

 परवा फेसबुकवरती एक पोस्ट वाचण्यात आली. उन्हाळ्याच्या सुटीत  वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा छंदवर्गामध्ये पोरांना घेऊन जाणा:या पालकांकडे बघून म्हणे ‘कार्बाईड टाकून हिरवे आंबे घाईने वेळेआधी पिकवणा:या व्यापा:यांची आठवण येते! ‘फेसबुकादपि सुभाषितम् ग्राह्यम्’.. ही आंब्यांची उपमा मुलांना देण्याची मूळ कल्पना कुणाची, हे माहिती नाही, पण त्याला मानलं पाहिजे. अगदी चपखल उपमा आहे. आणि त्याहून योग्य उपमा आहे, ‘व्यापा:यांची’. हे व्यापारी म्हणजे पालक की क्लासचालक की दोघेही, हे ज्याने-त्याने मनाशी ठरवावं. व्यापा:याला आंबा गोड आहे की, आंबट आहे; की बेचव आहे, याच्याशी काहीही कर्तव्य नसतं. त्याला तो खायचा नसतोच- फक्त ‘खपवायचा’ असतो. म्हणूनच कार्बाईड पावडर टाकून त्याचा रंग केशरी झाला की, तो पिकल्यासारखा दिसतो. एवढंच व्यापा:याला पुरेसं असतं. कारण मग गि:हाईकांच्या संतोषासाठी टोपलीत लाल कागदावरती रचावे, तसेच हे वरवर पिकलेले आंबे, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर रचता येतात. छान, संपूर्ण पान भरून ‘पासपोर्ट साईज’चे आंबे ओळीत रचलेले असतात-

‘‘या हो, या.. सा:यांनी या, बघा, बघा आमचे आंबे बघा. कितीही कच्चे पाठवा- पिकवण्याची आमची ग्यारंटी. प्रत्येक आंबा निदान नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकणारच! हे बघा इथे मांडलेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेले, मागच्या अढीतले छान-छान आंबे.. आम्हाला विसरू नका.. आंबे पिकवण्यात आम्हीच नंबर वन!’’
ते पेपरमधले आंबे पाहिले, की कसे सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात. प्रत्येकालाच इच्छा असते, की माङया झाडावरचा आंबा आधी पिकला पाहिजे. कुठेतरी पटतंय हो, की हे असं पावडर टाकून पिकवणं आंब्यासाठी चांगलं नाही, पण काय करणार? घरच्या घरी, कुटुंबाच्या संस्कारांमध्ये पिकवत बसलो, तर त्याला फारच वेळ लागतो. मग तोर्पयत इतरांकडचे आंबे पटापटा पिकून ‘बाजारात’ येतात; आणि आपला आंबा तसाच? कसं चालायचं हे? शेवटी, ‘कॉम्पिटिशन’मध्ये आपला आंबा मागे पडायला नको. हे सगळं आंब्याच्याच भल्यासाठी आहे. बरं, नुसता पिकवून चालत नाही; तर त्याचं वाणही बघावं लागतं! इथे प्रत्येक झाडाला हापूस आंबेच आले पाहिजेत, हा सगळ्यांचा अट्टाहास आहे. तोही र}ागिरी हापूस. यू.एस.एक्स्पोर्ट क्वॉलिटी! शेवटी इतका आटापिटा करून आंबा पिकवायचा कशासाठी? अमेरिकेत पाठवण्यासाठीच ना! मग देवगड हापूस पण चालणार नाही. र}ागिरी म्हणजे र}ागिरीच. (तो म्हणे पिकत असतानाच अमेरिकन गि:हाईकं उचलून घेतात-प्लेसमेंट का काय म्हणतात म्हणे त्याला.) इकडे कमी पिकणा:या आंब्याला ‘लंगडा आंबा’ म्हणायची पद्धत आहे. आपला आंबा ‘लंगडा’ आहे, हे कुणीच कबूल करायला तयार नसतं. त्यांना तो प्रचंड कमीपणा वाटतो. म्हणजे, ‘लंगडा आंबा’ ही एक स्वतंत्र जात आहे. तिला  स्वत:चं असं रंग-रूप आहे. स्वाद आहे. वेगळेपणा आहे.. हे कुणाला मान्यच नाही. तोच कशाला, पण पायरी, केशर, बदाम, तोतापुरी.. कुणाचंच वेगळेपण मान्य नाही. तो ‘हापूस’ नाहीये ना? मग संपलं. त्याच्यात काही अर्थ नाही. आमचं झाड कोणत्याही जातीचं असलं, कलमी असलं- कसंही असलं तरी त्याचा पिकल्यावर हापूसच झाला पाहिजे- नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पिकलेला हापूस! मग, टाका भरमसाठ पावडर. ती त्या कोवळ्या आंब्याला ङोपतेय की नाही, याची फिकीर नाही. आंबा सडून गेला? चिंता नाही. उचलून फेका टोपली बाहेर. त्याच्या जागी दुसरा आहेच पिकायला तयार. आंब्याचं नशीब, की त्याला बळजबरीने का होईना, पण ‘पिकवतात’. आपल्या देशात कैरीचं नशीब आंब्यांपेक्षाही वाईट आहे. कैरीला तर पिकण्याची संधी मिळेलच, याचीही खात्री नाही. कधी तिला ‘मोहोर’ असतानाच खुडून टाकतात. तर कधी वाढ होण्याआधीच घाईघाईने झाडावरून उतरवतात. आणि संसाराच्या खारात बुडवून लोणच्याच्या बरणीत कैद करून ठेवून देतात. आपण ‘हापूस’ आहोत, का ‘लंगडा’ आहोत, हे पडताळून बघण्याची तिला संधीच मिळत नाही. त्या आधीच तिच्या फोडी झालेल्या असतात. काही लोणच्याच्या खारात बुडतात, तर काही साखरेच्या पाकात बुडून ‘साखरांबा’ म्हणवतात. बरं, पाक साखरेचा-त्यामुळे तक्रार करायची नाही. गुदमरणं मग दोन्हीकडे सारखंच! आणि मुळात तिला पिकायचं होतं की नाही, हे तिला कोणी विचारतच नाही-
- नाही तरी, ‘‘तुझं आता काय करू?’’ असं कैरीला किंवा आंब्याला कधी कुणी विचारतं कां? ते आपणच ठरवणार. आपल्या झाडाचं फळ- त्यावर हक्क आपलाच! हो की नाही?