शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कालवे व पाटचाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:46 IST

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी : जामदा उजवा-डावा कालवा व पाटचारीची दुरवस्था

भडगाव : गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढली असून सफाई करण्यात यावी. यासह काही ठिकाणी दुरुस्ती व पाटचाऱ्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांच्या आवर्तनानुसार पाण्याचा लाभ मिळण गरजेचे आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाने तात्काळ या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.यावर्षी सर्वत्र धो धो पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक वर्षांतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. नाशिक जिल्हयातील गिरणा धरणावर गिरणा नदीतील पाण्याची आवक अवलंबून आहे. मात्र यावर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने गिरणा काठावरील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन गिरणा नदीला सुरुच असल्याने गिरणामाय खळखळून वाहत आहे. त्यात आता रब्बी हंगामासाठीही गिरणा नदीला व गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. कालव्यांना सुरुवातीस २ पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहीती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी गिरणा जामदा उजवा व डावा कालव्यालगत दुतर्फा गवत, झडपांसह घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे कालवे अस्वच्छ बनले आहेत. दोघा कालव्यांना काही ठिकाणी व मुख्य पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. आता रब्बी हंगामाला कालव्यांतून पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने तत्काळ गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याची दुतर्फा साफसफाई करावी. तसेच काही ठिकाणी कालव्याच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.