शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा फंडातील त्या ७० कोटींच्या कामांना बसू शकतो ब्रेक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर वाढत जाणारी नाराजी पाहता फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत भाजपने शहरातील विविध भागांत मनपा फंडातून ७० कोटींच्या निधीतून रस्ते करण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. यासाठी एका मक्तेदाराने हे काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, मनपातील सत्ता आता शिवसेनेकडे गेल्याने ही कामे होण्याची शक्यता कमी झाली आहे.

शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर सर्वदूर ओरड सुरू झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी एका खासगी मक्तेदारांकडून शहरातील रस्ते मनपा फंडातून करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्यानुसार महासभेत ७० कोटींच्या निधीतून शहरातील रस्ते तयार करण्याचा ठराव तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करून घेतला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यामुळे व हे काम करण्यासाठी मक्तेदार तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणला होता. त्यामुळे हे काम संबंधित मक्तेदाराकडून आताही करून घेतले जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा शहरातील रस्त्यांच्या कामांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्या ४२ कोटींच्या निधीतून केवळ रस्त्यांच्या कामांना दिले जाणार प्राधान्य

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली होती. अद्यापही या निधीवरील स्थगिती उठवण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिकेत आता शिवसेनेची सत्ता आल्याने त्यातच राज्यातदेखील शिवसेनेची सत्ता असल्याने, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी नगर विकासमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. दरम्यान, ४२ कोटींच्या निधीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केवळ १६ कोटी रुपयांच्या कामांचे रस्त्यांचे नियोजन केले होते. शहरातील रस्त्यांचा बिकट प्रश्न पाहता या ४२ कोटींच्या कामांच्या निधीत सर्व कामे ही रस्त्यातच केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

शहरातील नवीन रस्ते आता दिवाळीनंतरच

शहरात सुरू असलेली अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, शहरातील रस्त्यांचा प्रश्न सुटण्यासाठी अजूनही जळगावकरांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी महापालिका प्रशासनाकडे कोणताही निधी शिल्लक नसल्याने, त्यातच शासनाकडून मिळालेल्या निधीवरदेखील स्थगिती असल्याने येत्या दोन महिन्यांत तरी नवीन रस्ते होऊ शकत नाहीत. त्यातच जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांचे कोणतेही नवीन काम घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण झाले तरी शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांना आता दिवाळीनंतरच सुरुवात होईल, अशी शक्यता मनपातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.