शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा फंडातील त्या ७० कोटींच्या कामांना बसू शकतो ब्रेक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर मागच्या सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलेच वेठीस धरले होते. नागरिकांची रस्त्यांच्या प्रश्नावर वाढत जाणारी नाराजी पाहता फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत भाजपने शहरातील विविध भागांत मनपा फंडातून ७० कोटींच्या निधीतून रस्ते करण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. यासाठी एका मक्तेदाराने हे काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, मनपातील सत्ता आता शिवसेनेकडे गेल्याने ही कामे होण्याची शक्यता कमी झाली आहे.

शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर सर्वदूर ओरड सुरू झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी एका खासगी मक्तेदारांकडून शहरातील रस्ते मनपा फंडातून करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्यानुसार महासभेत ७० कोटींच्या निधीतून शहरातील रस्ते तयार करण्याचा ठराव तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करून घेतला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यामुळे व हे काम करण्यासाठी मक्तेदार तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणला होता. त्यामुळे हे काम संबंधित मक्तेदाराकडून आताही करून घेतले जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा शहरातील रस्त्यांच्या कामांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्या ४२ कोटींच्या निधीतून केवळ रस्त्यांच्या कामांना दिले जाणार प्राधान्य

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली होती. अद्यापही या निधीवरील स्थगिती उठवण्यात आलेली नाही. दरम्यान, महापालिकेत आता शिवसेनेची सत्ता आल्याने त्यातच राज्यातदेखील शिवसेनेची सत्ता असल्याने, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी नगर विकासमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. दरम्यान, ४२ कोटींच्या निधीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केवळ १६ कोटी रुपयांच्या कामांचे रस्त्यांचे नियोजन केले होते. शहरातील रस्त्यांचा बिकट प्रश्न पाहता या ४२ कोटींच्या कामांच्या निधीत सर्व कामे ही रस्त्यातच केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

शहरातील नवीन रस्ते आता दिवाळीनंतरच

शहरात सुरू असलेली अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, शहरातील रस्त्यांचा प्रश्न सुटण्यासाठी अजूनही जळगावकरांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी महापालिका प्रशासनाकडे कोणताही निधी शिल्लक नसल्याने, त्यातच शासनाकडून मिळालेल्या निधीवरदेखील स्थगिती असल्याने येत्या दोन महिन्यांत तरी नवीन रस्ते होऊ शकत नाहीत. त्यातच जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांचे कोणतेही नवीन काम घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण झाले तरी शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांना आता दिवाळीनंतरच सुरुवात होईल, अशी शक्यता मनपातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.