शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सी. सी. आय. ने कापूस खरेदी सुरु करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 17:02 IST

मागणी : व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची लूृट

हरताळा, ता. मुक्ताईनगर :  कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड येथील सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू करा तसेच सततच्या पावसाचा आर्थिक फटका बसलेल्या हवालदिल शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र शासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. काही शेतकऱ्यांना उभ्या पिकात जनावरे सोडावी लागली.  कापूस उत्पादक शेतकर्‍यांची अडचण गुलाबी बोंड अळीने वाढून कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय दराप्रमाणे ५८०० रुपयापर्यंत भाव मिळावा अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याला आपला  माल ४६००ते ४८०० रुपये दराने विकावा लागत आहे .  सुमारे एक हजार ते अकराशे रुपयांच्या फरकाने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने देखील याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे व शेतकर्‍यांनी केली आहे.आता रब्बी हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते , पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे.  त्यात तोंडवर असलेल्या दिवाळीचा खर्च असल्याने कापूस विकल्या शिवाय पर्याय नाही . मात्र अद्यापही शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना हजार ते अकराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कापूस वेचणी सात ते आठ रुपये किलो मजुरी देऊन  करावी लागत आहे . शेतात टाकलेले उत्पन्न घरात कसे येईल या विवंचनेत शेतकरी आहे. असे असून देखील शासनाला मात्र कापूस खरेदीचा अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.